'हिंदूंच्या सणांना परवानगी देताना हाताला लकवा का भरतो'

मुंबई : जेव्हा जेव्हा हिंदू सण येतात तेव्हा परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का? असा प्रश्न भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी उपस्थित करत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर गुढीपाडव्याच्या कार्यक्रमावरून निशाणा साधला आहे.


राम भक्तांवर ठाकरे सरकारचा काय राग आहे कळत नाही. गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच राम जन्माला देखील मिरवणूका निघतात पण याच्या परवानगीची सष्टता नसल्याचं शेलारांनी म्हटलं. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आतंकवादी ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहे, असं कारण देण्यात आलं आहे. 10 मार्च ते 8 एप्रिल 144 कलम लावण्यात आलं आहे.


शिवसेना कार्यक्रम करते तेव्हा ही कारणं येत नाहीत. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालतं. मात्र, गुढीपाडवा चालत नाही. यापुढे आम्ही हे चालू देणार नाही, असं अशिष शेलार यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मुंबईतील नालेसफाईत झालेल्या भ्रष्टाचारावर टीका केली. मुंबईत आम्ही ताकदीने सेवा करायचं ठरवलं आहे.


मुंबईतील सर्व नाल्यावर भाजप नालेसफाईची पाहणी आणि सुरुवात करणार आहे, असं शेलार म्हणाले. सत्ताधारी शिवसेनेनं हात झटकून दिले आहेत आणि प्रशासन हातावर हात धरून बसेल आहेत. आम्ही दोघांवरही नजर ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रॅंचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा