'हिंदूंच्या सणांना परवानगी देताना हाताला लकवा का भरतो'

  86

मुंबई : जेव्हा जेव्हा हिंदू सण येतात तेव्हा परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का? असा प्रश्न भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी उपस्थित करत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर गुढीपाडव्याच्या कार्यक्रमावरून निशाणा साधला आहे.


राम भक्तांवर ठाकरे सरकारचा काय राग आहे कळत नाही. गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच राम जन्माला देखील मिरवणूका निघतात पण याच्या परवानगीची सष्टता नसल्याचं शेलारांनी म्हटलं. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आतंकवादी ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहे, असं कारण देण्यात आलं आहे. 10 मार्च ते 8 एप्रिल 144 कलम लावण्यात आलं आहे.


शिवसेना कार्यक्रम करते तेव्हा ही कारणं येत नाहीत. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालतं. मात्र, गुढीपाडवा चालत नाही. यापुढे आम्ही हे चालू देणार नाही, असं अशिष शेलार यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मुंबईतील नालेसफाईत झालेल्या भ्रष्टाचारावर टीका केली. मुंबईत आम्ही ताकदीने सेवा करायचं ठरवलं आहे.


मुंबईतील सर्व नाल्यावर भाजप नालेसफाईची पाहणी आणि सुरुवात करणार आहे, असं शेलार म्हणाले. सत्ताधारी शिवसेनेनं हात झटकून दिले आहेत आणि प्रशासन हातावर हात धरून बसेल आहेत. आम्ही दोघांवरही नजर ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

बापरे, 'झोमॅटो'वरुन ऑर्डर करणे होणार एवढे महाग

मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात