नवाब मलिकांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची होणार चौकशी

मुंबई (प्रतिनिधी): मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने आता त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांची माहिती मुंबई उपनगरच्या रजिस्ट्रारकडे मागितली आहे. यासंबंधी रजिस्ट्रारशी पत्रव्यवहारही केला आहे. नवाब मलिक, त्यांची पत्नी, मुलगा फराज यांच्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तांसंबंधीची कागदपत्रे देण्यात यावीत, असे पत्रात नमूद केले आहे. ईडीने २४ मार्च रोजी हे पत्र पाठवले होते. दरम्यान, ईडीने यापूर्वी मलिक कुटुंबीयांकडे दस्तावेज मागितले होते. मात्र, ते न मिळाल्याने आता ईडीने रजिस्ट्रारकडे ही मागणी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.


मलिक यांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर कोठडीत बिछाना, खुर्ची आणि घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचा अर्जही मलिक यांनी कोर्टात केला होता. त्यावर कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य करण्यात आली. तर घरचे जेवण मिळण्याबाबत मलिक यांचा वैद्यकीय अहवाल बघून निर्णय देऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.