पाटणा : बिहारची राजधानी पटना येथील दानापूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष दीपक कुमार मेहता यांची सोमवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निवडणुकीच्या राजकारणातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.
यासंदर्भातील माहितीनुसार, मेहता हे दानापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. यादरम्यान त्यांना धमक्याही येत होत्या. दीपक यांनी काही दिवसांपूर्वी होळी मिलन समारंभाचे आयोजन केले होते. यात जेडीयू नेते उपेंद्र कुशवाह आणि भाजपचे प्रमुख नेतेही सहभागी झाले होते. दीपक यांचे उपेंद्र कुशवाह यांच्याशी जवळचे संबंध होते. दरम्यान, दीपक यांनी दानापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तेव्हा एका गुंडाने त्यांना धमकी दिली होती. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय.
गुन्हेगारांनी दीपकच्या डोक्यात एक, पोटात आणि फुफ्फुसात प्रत्येकी दोन गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर जेडीयूच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी दीपक मेहता यांच्या मारेकऱ्यांना लवकरात-लवकर अटक करण्याची मागणी केलीय. त्यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, पक्षाचे नेते आणि दानापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दीपक मेहता यांची गुन्हेगारांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने मला खूप दुःख झालेय. पोलीस प्रशासनानं गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलेय.
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…
डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…
- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…
- अल्पेश म्हात्रे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे संबंध असणारा बेस्ट उपक्रम सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे.…