जेडीयू नेत्याची गोळ्या घालून हत्या

पाटणा : बिहारची राजधानी पटना येथील दानापूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष दीपक कुमार मेहता यांची सोमवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निवडणुकीच्या राजकारणातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.


यासंदर्भातील माहितीनुसार, मेहता हे दानापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. यादरम्यान त्यांना धमक्याही येत होत्या. दीपक यांनी काही दिवसांपूर्वी होळी मिलन समारंभाचे आयोजन केले होते. यात जेडीयू नेते उपेंद्र कुशवाह आणि भाजपचे प्रमुख नेतेही सहभागी झाले होते. दीपक यांचे उपेंद्र कुशवाह यांच्याशी जवळचे संबंध होते. दरम्यान, दीपक यांनी दानापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तेव्हा एका गुंडाने त्यांना धमकी दिली होती. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय.


गुन्हेगारांनी दीपकच्या डोक्यात एक, पोटात आणि फुफ्फुसात प्रत्येकी दोन गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर जेडीयूच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी दीपक मेहता यांच्या मारेकऱ्यांना लवकरात-लवकर अटक करण्याची मागणी केलीय. त्यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, पक्षाचे नेते आणि दानापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष दीपक मेहता यांची गुन्हेगारांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने मला खूप दुःख झालेय. पोलीस प्रशासनानं गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलेय.

Comments
Add Comment

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार