'आता मुंबईकरांकडून पण ही 'वसूली' करणार का?'

मुंबई : एक एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा १४ टक्के अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.


'मुंबई महापालिकेतील 'माजी' कारभाऱ्यांनी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही अशा फुशारक्या मारल्या. मग प्रशासक बसताच मालमत्ता करात वाढ कुठून आली? प्रशासकाच्या आडून हे करायचे ठरलं होत का?,' असा सवाल शेलार यांनी केला आहे.


तसंच, 'महापालिकेवर प्रशासक बसला असला तरी राज्याच्या सत्तेच्या खुर्चीत तुम्हीच बसला आहात ना? करोनामुळे मुंबईकरांचे अर्थकारण बिडलेय हे दिसतेय ना? काही मदत करु शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका! आता मुंबईकरांकडून पण ही "वसूली" करणार का?,' असा संतप्त सवाल शेलार यांनी केला आहे.


दरम्यान, प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता कर वाढवण्यात येतो. यापूर्वी सन २०१५ मध्ये करवाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२०मध्ये कर वाढवण्यात येणार होता. मात्र करोनामुळे करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला. २०२१मध्ये पुढील चार वर्षांसाठी म्हणजे २०२५पर्यंत पालिकेने मालमत्ता करवाढीचा निर्णय घेतला होता. सध्याच्या रेडीरेकनर दरानुसार ही वाढ करण्यात येणार होती. ही करवाढ सुमारे १४ टक्के इतकी अपेक्षित असून त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात सुमारे एक हजार कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५