'सेलिब्रेटी असशील पण आरोपीही'

  28

मुंबई : बॉलीवूडची क्वीन असं स्वत:ला म्हणवणाऱ्या कंगनाची सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चा होत असते. राजकीय पुढा-यांसह तिने बॉलीवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. सध्या तिनं प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याशी वाद सुरु केला आहे. तो इतका टोकाला गेला ही थेट आता त्याची कोर्टात सुनावणी आहे. कोर्टानं दोन वेळा समन्स पाठवुनही कंगना हजर न राहिल्यानं अखेर कोर्टाला कडक शब्दांत कंगनाला सांगावं लागलं. त्यानंतर कंगना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहिली. मात्र कोर्टानं कंगनाला चांगलचं सुनावलं आहे. कोर्ट काय म्हणालं हे आपण जाणून घेणार आहोत. बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री असणाऱ्या कंगनावर वेगवेगळ्या वक्तव्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीची याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यानंतर कंगनाची डोकेदुखी काही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. अखेर मुंबईतील एका कोर्टानं कंगनाला याप्रकरणी चांगलचं झापलं आहे. सत्र न्यायाधीश आर आर खान यांनी कंगनाला तू सेलिब्रेटी असशील मात्र एका प्रकरणात आरोपीही आहेस हे विसरता कामा नये. असे म्हणून कोर्टाचा आदर राखण्यास सांगितलं आहे. कंगनानं अख्तर यांच्याविरोधात जी याचिका दाखल केली होती ती याचिका कोर्टानं रद्द केली आहे. त्यावर सुनावणी करताना खान म्हणाले, ही गोष्ट खरी आहे की, दोन वेळा आरोपी कंगनाला समन्स पाठविल्यानंतर त्या आता कोर्टासमोर हजर झाल्या आहेत.


या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान त्यांनी त्यांच्या सोयीनुसार काही अटी आणि शर्ती कोर्टाला सांगितल्या आहेत. मात्र त्यांना देखील कोर्टाचे नियम आणि त्याच्या प्रक्रिकेचा आदर हा करावाच लागेल. कंगना या प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत. यात शंका नाही. मात्र त्याबरोबर त्यांनी आपण एका प्रकरणात आरोपीही आहोत हे विसरु नये. दरम्यान, कंगनानं आपल्याला या मानहानी प्रकरणाच्या याचिका सुनावणी दरम्यान सुट मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र ती याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिलला होणार आहे.

Comments
Add Comment

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,