ठिकठिकाणची होळी

संपूर्ण भारतात होळी साजरी केली जाते, मात्र त्यातल्या काही ठिकाणांची ही ओळख...


होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. ग्रामीण भागात तो वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो तर अन्य ठिकाणी त्याला विविध नावं आहेत. गुलाल, अबीर आणि पिचकाा-यांचा वापर करून ठिकठिकाणी सर्रास होळी साजरी केली जाते. काही ठिकाणी राधा-कृष्णाची मंदिरं खूप सजवली जातात. महाराष्ट्रात तर कशी होळी खेळली जाते हे आपल्यााल सगळळ्यांनाच माहिती आहे. मात्र अन्य ठिकाणी कशी होळी खेळली जाते हे पाहूया.


मथुरा


मथुरेतली होळी पाहण्यासाठी संपूर्ण भारतातील लोक येतात. कारण मथुरा ही कृष्णाची भूमी आहे. म्हणून ती कृष्णनगरी या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी कृष्णाने गोपींबरोबर याच भूमीवर होळी खेळली आहे. म्हणूनच इथली होळीची मजा काही औरच असते.


या ठिकाणी होळी आठवडाभर साजरी केली जाते. या ठिकाणी कृष्णाच्या प्रत्येक मंदिरात एकेक दिवशी होळी साजरी केली जाते. वृंदावन येथील बकाई-बिहारी या मंदिरात होळी कशी साजरी केली जाते ते पाहण्यासाठी येतात. दुसरं ठिकाण म्हणजे ब्रजमधलं गुलाल कुंड. हे ठिकाण गोवर्धन पर्वताजवळ आहे. कारण या ठिकाणी कृष्णलीला सादर केल्या जातात. या ठिकाणी सगळे जण एकत्र येऊन एकमेकांवर पिचका-यांनी रंग उडवतात.


पंजाब


पंजाबमध्ये होळीला होला मोहल्ला असं म्हटलं जातं. या दिवशी ते त्यांचं पारंपरिक शस्त्र कुश्ती बाहेर काढतात. आणि मोठमोठय़ाने ओरडत एकमेकांना शुभेच्छा देतात. हलवा, मालपोवा, पुरी, गुज्जा, फणस, असे तोंडाला पाणी सुटणा-या पदार्थाची रेलचेल असते. ते होळी पेटवत नाही. हे त्यांचं वैशिष्टय़च म्हणावं लागेल. खरं म्हणजे हा सण होळीच्या दुस-या दिवशी साजरा केला जातो. विशेषत: निहांग पंथाचे शीख हा दिवस साजरा करतात.


उत्तर प्रदेश


इतर ठिकाणांप्रमाणे या ठिकाणीही होलिका दहन करूनच होळी साजरी केली जाते. भक्त प्रल्हादाच्या गोष्टीला या ठिकाणी खूप महत्त्व आहे. भांग हा पदार्थ केला नाही तर तिथली होळी अपूर्णच राहते. ठिकठिकाणी ही भांग विकली जाते. या ठिकाणी होळीच्या दिवशी लहान होळी साजरी केली जाते.


तामिळनाडू


तामिळनाडूला कामदेवासाठी होळी साजरी केली जाते. या दिवशी रती आणि गाणी म्हटली जातात. हा दिवस कामविलास, कामन पँडिगई आणि काम दहनम या नावाने ओळखला जातो.


दिल्ली


या दिवशी लोकं एकमेकांकडे आवर्जून भेट द्यायला जातात. पार्टी, म्युझिक, नृत्य आदी गोष्टींनी हा दिवस साजरा केला जातो. एकमेकांना अबिराचा तिलक लावतात आणि भेट देतात. होळीच्या दिवशी होली दहन केलं जातं. वाईटावर चांगल्याची मात म्हणून ही होळी पेटवली जाते.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात