बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील निर्भया रसायन या कारखान्याला लागलेल्या आगीत कारखाना जळून खाक झाला आहे. मंगळवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेच्या दरम्यान आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर बुधवारी पहाटे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
दरम्यान, कारखान्याला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारखान्याला लागलेल्या आगीच्या ज्वाळा आणि धूर काही किलोमीटर अंतरावरून दिसून येत होता. दरम्यान, प्रसंगावधान राखत कारखान्यातील २१ कामगार कारखान्यातून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली टळली. तथापि, कारखान्याचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लाट क्रमांक एन ९६ मधील निर्भया रसायन प्रा. लि. कारखान्यात सीपीसी ब्लू डाईज नावाचे रसायनाचे उत्पादन घेतले जाते. मंगळवारी (दि. ८ मार्च) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना कारखान्याला भयानक आग लागली होती. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाचे तीन बंब, भाभा अणुशक्ती केंद्र आणि पालघर नगर परिषदेचा एक मिळून पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर पहाटे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…
राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…
प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…
यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…