तारापूर औद्योगिक वसाहतीमधील निर्भया रसायन कारखान्याला भीषण आग

बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील निर्भया रसायन या कारखान्याला लागलेल्या आगीत कारखाना जळून खाक झाला आहे. मंगळवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रियेच्या दरम्यान आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर बुधवारी पहाटे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.


दरम्यान, कारखान्याला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारखान्याला लागलेल्या आगीच्या ज्वाळा आणि धूर काही किलोमीटर अंतरावरून दिसून येत होता. दरम्यान, प्रसंगावधान राखत कारखान्यातील २१ कामगार कारखान्यातून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली टळली. तथापि, कारखान्याचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.


तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्लाट क्रमांक एन ९६ मधील निर्भया रसायन प्रा. लि. कारखान्यात सीपीसी ब्लू डाईज नावाचे रसायनाचे उत्पादन घेतले जाते. मंगळवारी (दि. ८ मार्च) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना कारखान्याला भयानक आग लागली होती. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयडीसी अग्निशमन दलाचे तीन बंब, भाभा अणुशक्ती केंद्र आणि पालघर नगर परिषदेचा एक मिळून पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर पहाटे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Comments
Add Comment

सहकारी गृहनिर्माण संस्थाना न्यायालयाचा दिलासा! आता खासगी विकासकाची निवड केल्यास 'एनओसी'ची गरज भासणार नाही

मुंबई: इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाविषयी अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांनी बहुमताने खासगी विकासकाची निवड

Monorail Accident : 'ट्रॅक सोडून बाहेर'! वडाळा स्थानकाजवळ मोनोरेलचा भीषण अपघात; पहिला डबा खांबांवरच अडकला, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईच्या मोनोरेल सेवेला (Mumbai Monorail Service) लागलेले अपघातांचे ग्रहण काही सुटताना दिसत नाहीये. आज बुधवारी सकाळी

Eknath Shinde : 'गुवाहाटी' उठावाची खरी स्क्रिप्ट माझ्याकडेच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; 'पुस्तक लिहायचं तर मला विचारूनच लिहावं लागेल!'

मुंबई : शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी करून 'गुवाहाटी' (Guwahati) गाठण्याच्या आणि त्यानंतर सत्तेत परतण्याच्या घटनेमागील

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ; ई-केवायसीची मुदत वाढवली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून चार टक्के व्याज सवलत

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश मुंबई  : महाराष्ट्रातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायाशी

विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत