मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपणार आहे. त्याच दिवशी स्थायी समितीची शेवटची सभा होणार आहे. या सभेत कोणते प्रस्ताव मंजूर होतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
७ मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपणार असून त्याच दिवशी म्हणजे सोमवार ७ मार्च रोजी स्थायी समितीची शेवटची सभा होणार आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एकूण १७९ प्रस्ताव मांडण्यात आले होते. एवढे प्रस्ताव सभेत असल्याने भाजपकडून विरोध केला, तर बुधवारी झालेल्या स्थायी समितीत १७९ मधील ९५ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत.
सोमवार ७ मार्चला होणाऱ्या स्थायी समितीत हे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. काही प्रस्तावात कामातील खर्चाची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे ७ मार्चला कोणते प्रस्ताव मंजूर होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…