राज्यपाल-सरकारमधील संघर्ष पुन्हा ऐरणीवर

  93

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असून आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरी अध्यक्षपद निवडले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या अधिवेशनात देखील यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष होण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.


९ मार्च रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी, याबाबत राज्य सरकारने २३ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले आहे. मात्र, राज्यपालांनी अजूनही त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे राज्यपालांना पुन्हा एकदा स्मरण पत्र देण्याबाबत सरकार मध्ये विचार सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का, यावर प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे.


नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर वर्षभर अध्यक्षपद रिक्त आहे. नियम बदलून आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाला विरोधी पक्षाने विरोध दर्शवला. तर २७, २८ डिसेंबरला निवडणूक घेण्याचा कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला. मात्र निवडणुकीत आवाजी मतदान घटनाबाह्य असल्याचं उत्तर राज्यपालांनी दिलं. राज्यपालांनी परवानगी न दिल्यानं सरकारने पत्र पाठवलं. त्यानंतर राज्यपालांनी त्या पत्राला उत्तर पाठवलं. काँग्रेस अध्यक्ष निवड करण्यावर ठाम आहे तर राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवड करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली होती.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील