आत्मनिर्भर भारताद्वारे भारतीय उत्पादने जगभरात पोहोचतील: डॉ. मनसुख मंडवीया

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मंडवीया यांनी “इंडस्ट्री कनेक्ट 2022: उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील एकत्रित ऊर्जा” या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन केले.


या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री मांडवीया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोविड-19 महामारीचे परिणामकारक व्यवस्थापन केले आहे. ते पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी वैज्ञानिक आणि वैद्यकीय समुदायाला सर्व प्रकारचा पाठींबा दिला आहे त्यामुळे भारत आता लस संशोधनाच्या बाबतीत इतर विकसित देशांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभा राहील याची सुनिश्चिती झाली आहे.


केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलताना कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये अभिनव संशोधन आणि तंत्रज्ञानाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले तसेच संशोधन, नवोन्मेष आणि शिक्षण यांना चालना देण्यासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. नाविन्यपूर्ण संशोधनाविषयी आस्था आणि दर्जेदार उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ चे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असे देखील त्यांनी सांगितले.


अत्यंत उत्तम दर्जाची भारतीय उत्पादने जगभरात सर्वदूर पोहोचतील आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच भारताच्या आर्थिक भरभराटीसाठी मोठे योगदान देतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करण्यावर या परिसंवादात चर्चा होईल असा विश्वासही केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी या प्रसंगी व्यक्त केला. केंद्रीय रसायने आणि खते तसेच केंद्रीय नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा देखील या वेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Jalgoan Crime : बाप की कसाई? जळगावात चौथी मुलगी झाली म्हणून ३ दिवसांच्या चिमुकलीची पाटाने ठेचून हत्या, जळगाव हादरलं!

जळगाव : मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एका नराधम पित्याने केवळ

दोन वाहनांच्या धडकेत जिवगल मैत्रिणींचा नाहक बळी

सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातावर हळहळ व्यक्त होत आहे. कारण या

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा