वसईत गारमेंट कंपनीच्या गोदामला आग

नालासोपारा (वार्ताहर) : शनिवारी सकाळी १० च्या सुमारास वसई पूर्व नवघर येथील एका गारमेंट कंपनीच्या गोदामला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यात पालिकेच्या अग्नीशमन विभागाला यश आले आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, गोदामातील सर्व माल जळून खाक झाला आहे. आगीचे नमके कारण कळले नसले तरी शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन विभागाने वर्तवला आहे.


वसई पूर्व नवघर येथे असलेल्या व्हिक्टोरी रेडिमेट शर्ट बनवण्याच्या कंपनीत पहिल्या मजल्यावर गाळा क्रमांक ८ येथे सकाळी अचानक धूर निघू लागल्याने कामगारांनी वसई-विरार महालिकेच्या अग्निशमन विभागाला आग लागल्याची वर्दी दिली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोहचपर्यंत स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही क्षणांतच आगीचा भडका उडल्याने सदराची इमारत रिकामी करण्यात आली. अग्निशमन विभागाने तीन पाण्याचे बंब आणि १२ जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक