वसईत गारमेंट कंपनीच्या गोदामला आग

  108

नालासोपारा (वार्ताहर) : शनिवारी सकाळी १० च्या सुमारास वसई पूर्व नवघर येथील एका गारमेंट कंपनीच्या गोदामला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यात पालिकेच्या अग्नीशमन विभागाला यश आले आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, गोदामातील सर्व माल जळून खाक झाला आहे. आगीचे नमके कारण कळले नसले तरी शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन विभागाने वर्तवला आहे.


वसई पूर्व नवघर येथे असलेल्या व्हिक्टोरी रेडिमेट शर्ट बनवण्याच्या कंपनीत पहिल्या मजल्यावर गाळा क्रमांक ८ येथे सकाळी अचानक धूर निघू लागल्याने कामगारांनी वसई-विरार महालिकेच्या अग्निशमन विभागाला आग लागल्याची वर्दी दिली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोहचपर्यंत स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही क्षणांतच आगीचा भडका उडल्याने सदराची इमारत रिकामी करण्यात आली. अग्निशमन विभागाने तीन पाण्याचे बंब आणि १२ जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं