मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार

  103

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खळबळजनक दावा


मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी करणे आणि बेकायदा बांधकामाची मोजणी करण्यासंदर्भात नोटीस पाठवली. यानंतर लगेचच नारायण राणे यांनी ट्विट करत खळबळजनक दावा केला आहे. मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असे राणे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. राणे यांच्या या ट्विटमुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणांचाही उल्लेख केला आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकसी पुन्हा होईल असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यानंतर त्यांनी मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचेही म्हटले आहे. मात्र हे चौघे कोण याचा उल्लेख राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला नाही.


नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.


शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांवर आरोप करत हल्ला चढवला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. आता मुंबई महापालिकेकडून राणे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर हा वाद अधिक चिघळणार अशी चर्चा सुरू असतानाच आता राणे यांनी ट्विट करत हा नवा गौप्यस्फोट केला आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता