मला कोरोनाची भीती नाही : राज्यपाल कोश्यारी

  75

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवनात नव्या दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. माझ्या आईने मला खूप करुणा दिली त्यामुळे मला कोरोनाची भीती नाही, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांच्या भाषणावेळी सांगितले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात आपले बोलणे आटोपले. त्यांनी या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाच्या परिसराचे वैशिष्ठ्य सांगताना म्हटले की, मलबार हिल तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. अनेक वर्षांपासून बाण गंगा देखील येथे वास करते. सिद्धिविनायक आणि मुंबा देवीची यावर कृपा आहे. मी अडीच वर्षांपासून इथे आहे आणि राजभवन केवळ राजकीय वस्तू नाही तर ते लोकांसाठी असावे. विशेष करून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला, असेही ते म्हणाले.


कोरोनानंतर ५-६ महिन्यांनंतर माझ्याकडे लोकांनी येऊन काही अधिकाऱ्यांचे कौतुक केलं आणि त्यांचा गौरव करण्यास सांगितलं. जवळ जवळ ५००० लोकांचा मी गौरव केला, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर