देशात एअरटेलची सेवा ठप्प

नवी दिल्ली : मुंबईसह दिल्ली, जयपूर, कोलकाता यांसारख्या देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे. एअरटेलची सेवा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. सोशल मीडियावर एअरटेलचे नेटवर्क बंद झाल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत. ट्विटरवर #AirtelDown ट्रेंड करत आहे.


https://twitter.com/airtelindia/status/1492021184846008321

दिल्ली, मुंबई, नोएडा आणि इतर अनेक ठिकाणी फायबर इंटरनेट, ब्रॉडबँड, तसेच मोबाइल नेटवर्कचे सर्व एअरटेल कनेक्शन बंद आहेत. अनेक वापरकर्त्यांनी ब्रॉडबँडच्या समस्यांबाबतही तक्रार केली आहे. वापरकर्त्यांचा दावा आहे की एअरटेल थँक्स अॅप देखील काम करत नाही.


DownDetector च्या मते, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे.


दरम्यान, एअरटेलने ट्विट करून आउटेजची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमच्या इंटरनेट सेवांमध्ये थोडासा व्यत्यय आला आणि यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता आमची सेवा सुरळीत झाली आहे. आमचे कर्मचारी आमच्या ग्राहकांना अखंड अनुभव देण्यासाठी काम करत आहेत.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे