आयपीएल महालिलावासाठी बीसीसीआय सज्ज

  68

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआय सज्ज आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे १० फ्रँचायझी मालक उपलब्ध ५९० क्रिकेटपटूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल आयोजकांनी ऑक्शनच्या वेळेत बदल केला असून आता सकाळी ११ वाजता बोली सुरू होईल.


यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि अहमदाबाद हे दहा फ्रँचायझींचा समावेश आहे.


कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून लिलाव प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. आयपीएल २०२२ ऑक्शन हे पूर्णपणे बायो-बबलमध्ये पार पडणार आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं कोरोना लसीसंदर्भाची सर्व माहिती द्यायला हवी आणि सर्व सदस्यांनी माक्स घालणे अनिवार्य आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये राइट टू मॅच (आरटीएम) हा पर्याय नसणार आहे. मुदत संपल्यानंतर कोणताही संघ त्यांच्या जुन्या खेळाडूला रिटेन करू शकत नाही. याचा सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या मोठ्या संघाना बसला आहे.



५९० खेळाडूंवर बोली लागणार


लिलावासाठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कॅगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, वनिंदू हसरंगा, आदी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. भारताच्या श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश ऱैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव, आदी खेळाडूंसाठी चढाओढ आहे. प्रत्येक फ्रँचायझीला या ऑक्शनसाठी प्रत्येकी ९० कोटी बजेट दिले गेले आहेत आणि त्यापैकी ८० कोटी हे खेळाडूंवर खर्च करायला हवेत.



अर्जुन तेंडुलकर पात्र, परंतु, युवा वर्ल्डकप जिंकून देणार ८ खेळाडू अपात्र


विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन हा लिलावासाठी पात्र ठरला आहे. मात्र, वेस्ट इंडिजमध्ये झालेला युवा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघातील आठ खेळाडू अपात्र ठरले आहेत. या खेळाडूंमध्ये जेतेपदात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शेख राशीद, दिनेश बाना, रवी कुमार यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या पात्रता निकषानुसार, हे क्रिकेटपटू लिलावासाठी पात्र नाहीत. बीसीसीआयच्या नियमानुसार अनकॅप ( राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू) खेळाडूला ऑक्शनसाठी पात्र होण्यासाठी दोन नियमांची पुर्तता करणे गरजेचे आहे.यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने नुकताच १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला. अंतिम सामन्यात राज बावा विजयाचा शिल्पकार ठरला. शेख राशीद, यश धुल, रवी कुमार यांनीही ही स्पर्धा गाजवली.

Comments
Add Comment

ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?

मुंबई:  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी १०

युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला

IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,