'हत्तीची गरज काय? तुम्ही अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन'

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील पंडित ऑटोमोटिव्‍हच्‍या जागेच्‍या कारणावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे या दोन्‍ही राजांमध्ये टीकायुध्‍द सुरु आहे. एकमेकांवर हल्लाबोल करण्याची संधी हे दोन्ही नेते कधीही सोडत नाहीत. शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उदयनराजेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला चिरडायचे असेल तर हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन, असा टोला त्यांनी लगावला.


आमदार शिवेंद्रराजे यांनी पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय करणा-या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं असतं, असं विधान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंचं नाव न घेता केलं होतं. त्याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले.


सातारा एमआयडीसी वाढत नसल्‍याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे असून उद्योजकांना धमकावणे, दमदाटी करणे, वसुल्‍या करायच्‍या आदी कामे ते आणि त्‍यांचे बगलबच्‍चे करतात. या व इतर अनेक कारणांमुळे सातारा एमआयडीसीऐवजी उद्योजकांनी इतर ठिकाणांना पसंदी दिल्‍याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. कारखानदारांकडून हप्ते घेणं, त्यांना दमटाटी करणं यामुळे सुद्धा साता-यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत आणि असलेल्या कंपन्या निघून गेल्या आहेत. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपूर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे, त्यामुळे उदयनराजेंचे हे आरोप बिनबुडाचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद