ठाण्यातील प्रभागरचना रद्द करण्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी

  52

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात सापडली असतानाच, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही राजकीय पक्षांना अनुकूल असलेली व सध्या जाहीर केलेली प्रभागरचना संपूर्णपणे रद्द करून नवी प्रभागरचना करावी, अशी मागणी भाजपाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन वसंत डावखरे यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली.


ठाणे महापालिकेच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे पूर्वीच्या १३० नगरसेवकांच्या संख्येत ११ ने वाढ झाली. घोडबंदर रोड, दिवा परिसरात नगरसेवकांची संख्या वाढण्याची सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र, ठाणे शहराची केवळ १८ टक्के लोकसंख्या असलेल्या मुंब्र्यात ४, तर ८२ टक्के लोकसंख्या असलेल्या ठाण्यात ७ नगरसेवक वाढले. त्यात वागळे इस्टेट भागातील पाच वाढीव जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांच्या मतदारसंघातच सहा नगरसेवक वाढले. मात्र, झपाट्याने लोकसंख्या वाढ झालेल्या घोडबंदर रोड व दिवा भागात नगरसेवकांची संख्या घटली. त्यामुळे प्रभागरचनेबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपानेही आक्रमक भूमिका घेऊन प्रभागरचनेला विरोध केला आहे.


महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेली प्रभाग रचना ही केवळ सत्ताधाऱ्यांना लाभ व्हावा, यादृष्टीने हेतुपुरस्सर पद्धतीने करण्यात आली. त्यात सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टपणे हस्तक्षेप झाला असल्याचा भाजपाचा आरोप आहे. लोकसंख्येच्या आधारावर वा भौगोलिक दृष्टीकोनाने प्रभाग रचना केली जाते. मात्र, काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा, त्यांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ व्हावी, हा उद्देश ठेवण्यात आला होता. त्यामुळे या प्रभागरचनेला भाजपाचा आक्षेप आहे. राज्य निवडणूक आयोगाने लोकहित व लोकन्यायासाठी हस्तक्षेप करून प्रभाग रचना सुरळीत करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Comments
Add Comment

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे