अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर हेच मास्टरमाईंड

मुंबई (प्रतिनिधी) : अँटिलिया स्फोटके प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंग हेच मास्टरमाईंड असल्याचा मोठा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर केला आहे.


अँटिलियासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंग दिशाभूल करत होते. कारण या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते आणि सिंग हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असे आपल्याला कळले होते. म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.


परमबीर सिंग यांना पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. अँटिलिया घोटाळा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांच्यासह त्यांचे जवळचे मित्र सचिन वाझे आणि अन्य चार जणांची नावे समोर आल्याने सिंग यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काठ्या लावल्याचा आरोप होता, या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. ब्रीफिंगसाठी बोलावले होते, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंग यांना बोलावले तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंगवेळी अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंग देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती. यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यामधून अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. तसेच सचिन वाझेआणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अनिल देशमुख मोठे आरोपही करत आहेत.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता