आरोग्य केंद्रातील निवृत्त शिपायाने उघडलेल्या दवाखान्यात चुकीच्या उपचारांमुळे झाला पाच गावकऱ्यांचा मृत्यू

मुरबाड : बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने मुरबाडच्या धसई परिसरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता. मात्र, त्याला निवृत्त होऊन बराच कालावधी उलटला होता.


बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने दोन दिवसांत पाच जणांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाडमध्ये उघडकीस आला आहे. पांडुरंग घोलप असे या 'बोगस डॉक्टर'चे नाव असून तो धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करीत होता. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या नराधम शिपायाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे शिपाई असलेला पांडुरंग घोलप याने बिनदिक्कतपणे धसईत दवाखाना थाटला होता. नोकरी करतानाच तो या क्लिनिकमध्ये आदिवासींवर उपचार करायचा. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्याचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुच होता. विशेष म्हणजे यापूर्वी काही सजग नागरिकांनी याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. या बेफिकिरीमुळे २४ व २६ जानेवारी रोजी धसईतील इंदिरानगर वाडीतील बारकुबाई वाघ, चिखलवाडीतील आशा नाईक यांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ राम असवले (मिल्हे), अलका मुकणे (मिल्हे), लक्ष्मण मोरे (पळू) यांचाही चुकीच्या उपचारामुळे बळी गेला. या प्रकरणी नातेवाईकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.


याप्रकरणी आदिवासी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने आवाज उठवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उमेश वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत आणि कोणताही परवाना नसतांना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बोगस डॉक्टर घोलप याला पोलिसांनी अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.दरम्यान या प्रकरणात सर्व आदिवासींचा मृत्यू झाल्याने अ‍ॅट्रोसिटी कलम देखील या डॉक्टरवर लावण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक