आरोग्य केंद्रातील निवृत्त शिपायाने उघडलेल्या दवाखान्यात चुकीच्या उपचारांमुळे झाला पाच गावकऱ्यांचा मृत्यू

मुरबाड : बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने मुरबाडच्या धसई परिसरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता. मात्र, त्याला निवृत्त होऊन बराच कालावधी उलटला होता.


बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने दोन दिवसांत पाच जणांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाडमध्ये उघडकीस आला आहे. पांडुरंग घोलप असे या 'बोगस डॉक्टर'चे नाव असून तो धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करीत होता. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या नराधम शिपायाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे शिपाई असलेला पांडुरंग घोलप याने बिनदिक्कतपणे धसईत दवाखाना थाटला होता. नोकरी करतानाच तो या क्लिनिकमध्ये आदिवासींवर उपचार करायचा. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्याचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुच होता. विशेष म्हणजे यापूर्वी काही सजग नागरिकांनी याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. या बेफिकिरीमुळे २४ व २६ जानेवारी रोजी धसईतील इंदिरानगर वाडीतील बारकुबाई वाघ, चिखलवाडीतील आशा नाईक यांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ राम असवले (मिल्हे), अलका मुकणे (मिल्हे), लक्ष्मण मोरे (पळू) यांचाही चुकीच्या उपचारामुळे बळी गेला. या प्रकरणी नातेवाईकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.


याप्रकरणी आदिवासी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने आवाज उठवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उमेश वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत आणि कोणताही परवाना नसतांना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बोगस डॉक्टर घोलप याला पोलिसांनी अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.दरम्यान या प्रकरणात सर्व आदिवासींचा मृत्यू झाल्याने अ‍ॅट्रोसिटी कलम देखील या डॉक्टरवर लावण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

Comments
Add Comment

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या

मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि

मुंबईतील कोस्टल रोडवर सहा ठिकाणी बायोटॉयलेटची सुविधा

प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधा मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी

Budget 2026 : रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट! कंटाळवाणा प्रवास विसरा, वंदे भारत सुसाट धावणार; पाहा काय आहे प्लॅन?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) सलग नवव्यांदा

Budget 2026-27 : रविवारी बजेट; शेअर बाजार सुरू असणार की बंद? जाणून घ्या

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील.

Sunetra Pawar : मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने