Sunetra Pawar : मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. आज दुपारी २ वाजता विधिमंडळात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. या निवडीवेळी पक्षाच्या सर्व आमदारांनी आपली एकजूट दाखवून दिली. या नियुक्तीनंतर लगेचच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. केंद्रातील राजकारण सोडून आता त्या पूर्णपणे राज्याच्या राजकारणात स्थिरावणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी दिमाखात पार पडणार असून, अजित दादांनंतर राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा वहिनींच्या समर्थ खांद्यावर आली आहे.



सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा


राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास सज्ज झाल्या आहेत. या मोठ्या जबाबदारीपूर्वी त्यांनी तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आपल्या राज्यसभा खासदारकीचा अधिकृत राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून थोडक्यात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलली. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवण्यासाठी आणि विधानसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांना खासदारकी सोडावी लागणार होती, त्यानुसार त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधीमुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. अजित दादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी दिल्लीचे राजकारण सोडून आता थेट मुंबईत राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.



आता सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या पत्रासह नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


आज पार पडलेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत अत्यंत भावूक वातावरणात सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीचे अधिकृत पत्र आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत. बैठकीच्या सुरुवातीला सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडून अजित दादांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी तातडीने अनुमोदन दिले. उपस्थित सर्व ४० हून अधिक आमदारांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिल्याने सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबतच अत्यंत महत्त्वाचे असलेले अर्थ मंत्रालय (वित्त खाते) होते. आता सुनेत्रा पवार हे खाते स्वतःकडेच ठेवणार की अनुभवी दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या शपथविधीनंतर या खात्यांच्या वाटपाचा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील