थोबाड फुटले... राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडावर सणसणीत आपटले

  61

मुंबई : थोबाड फुटले... आमच्याकडे बहुमत आहे या गुर्मीत भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडावर सणसणीत आपटले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिली आहे.


ते म्हणाले, हा निर्णय महाभकास आघाडी सरकारचा थोबाड फोडणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (ता.२८) भाजपचे १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांनी गैरवर्तन केल्याबद्दल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी वर्षभरासाठी निलंबन केले होते. त्या निलंबनाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


त्याचा निर्णय आज न्यायालयाने दिला आहे. भातखळकर म्हणाले, केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून बेकायदेशीर पद्धतीने निलंबित करण्यात आले. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मोडून काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो.

Comments
Add Comment

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

बापरे, 'झोमॅटो'वरुन ऑर्डर करणे होणार एवढे महाग

मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात