नेटवर्क समस्या, तरीही गावाचा विकास आराखडा ऑनलाईन भरण्याचा अट्टाहास

  89

मुंबई : राज्यातील अनेक गावात ४जीचे मोबाईल पोहचले असले तरी अनेक गावांमध्ये नेटवर्कची सर्वात मोठी समस्या आजही जाणवते. या नेटवर्कच्या समस्येचा सर्वाधिक फटका हा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला बसत आहे.


नेमणूक झालेल्या गावात रेंज नसल्यामुळे अनेक ग्रामसेवकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आराखडे भरण्याचे काम करावे लागत आहेत. येत्या ३० जानेवारीपर्यंत विकास आराखडे भरून देण्याची मुदत आहे. या मुदतीतच काम पूर्ण करावे लागणार आहे.


केंद्र व राज्य सरकार तसेच ग्रामपंचायतींना स्व उत्पन्नातून मिळालेल्या निधीतून गावात काय सुविधा व विकास केला जाणार आहे, याबाबतचा विकास आराखडा तयार करायच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. याबरोबरच कोणत्या योजनांवर किती खर्च करावा या सूचनाही देण्यात आल्या आहेत. योजना राबवत असताना प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन यावर प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. गतवर्षापासून ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.