मुंबईत लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : मुंबईत कोरोना लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई गुन्हे शाखेने गोरेगाव परिसरात केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही टोळी लस न घेतलेल्यांना लसीचे दोन्ही डोस झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देत होती आणि त्या बदल्यात १,५०० रुपये घेतले जात होते.


गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. यात गुन्हे शाखेसह मुंबई महापालिकेच्या पथकाने संयुक्तरित्या गोरेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्हे शाखेने लसीची अनेक बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही टोळी ज्यांनी कोविड-१९ लसीचा डोस घेतलेला नाही अशा लोकांना कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्रे देत होती. आतापर्यंत या लोकांनी सुमारे ७५ जणांना कोरोना लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे विकली आहेत. बनावट प्रमाणपत्राच्या बदल्यात ही टोळी लोकांकडून १,५०० रुपये घ्यायची. हा धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. या कारवाईनंतर या दोन आरोपींशिवाय या टोळीत आणखी कोणी सहभागी आहेत का आणि या टोळीने आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, याचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी