मुंबईत लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या दोघांना अटक

  76

मुंबई : मुंबईत कोरोना लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई गुन्हे शाखेने गोरेगाव परिसरात केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही टोळी लस न घेतलेल्यांना लसीचे दोन्ही डोस झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देत होती आणि त्या बदल्यात १,५०० रुपये घेतले जात होते.


गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. यात गुन्हे शाखेसह मुंबई महापालिकेच्या पथकाने संयुक्तरित्या गोरेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्हे शाखेने लसीची अनेक बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही टोळी ज्यांनी कोविड-१९ लसीचा डोस घेतलेला नाही अशा लोकांना कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्रे देत होती. आतापर्यंत या लोकांनी सुमारे ७५ जणांना कोरोना लसीकरणाची बनावट प्रमाणपत्रे विकली आहेत. बनावट प्रमाणपत्राच्या बदल्यात ही टोळी लोकांकडून १,५०० रुपये घ्यायची. हा धंदा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. या कारवाईनंतर या दोन आरोपींशिवाय या टोळीत आणखी कोणी सहभागी आहेत का आणि या टोळीने आतापर्यंत किती लोकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, याचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात