नवी दिल्ली : उत्तर भारतात अनेक भागात दाट धुके आणि थंडीचा परिणाम दिसून येत आहे. एकीकडे वाढत्या थंडीमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असतानाच खराब हवामानाचा परिणाम रेल्वे सेवेवरही होत आहे. देशातील अनेक भागात धुके इतके आहे की दररोज अनेक गाड्या कमी दृश्यमानतेमुळे कित्येक तास उशिराने धावत आहेत.
दिल्लीतील काही भागात हलका पाऊस पडला. दुसरीकडे, दाट धुक्यामुळे १३ ट्रेन उशिराने धावत असून २२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. हावडा-नवी दिल्ली एक्सप्रेस, पुरी-नवी दिल्ली एक्सप्रेस, गोरखपूर-नवी दिल्ली एक्सप्रेस, मुंबई-नवी दिल्ली एक्सप्रेस, कानपूर-नवी दिल्ली एक्सप्रेस यासह सुमारे १३ ट्रेन दाट धुक्यामुळे उशिराने धावत आहेत.
उशिराने धावणाऱ्या या गाड्यांच्या नावांमध्ये भालपूर-आनंद विहार एक्सप्रेस, आंबेडकरनगर-निजामुद्दीन एक्सप्रेस, मुंबई-नवी दिल्ली दादर एक्सप्रेस, विशाखापट्टणम-निजामुद्दीन एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
राजधानी दिल्लीत गेल्या ७ दिवसांपासून सततच्या थंडीच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. सलग सातव्या दिवशी दिल्लीला थंडीच्या लाटेपासून पूर्ण दिलासा मिळू शकला नाही. दरम्यान, दिल्लीत आज पाऊस पडू शकतो, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे सूर्यदर्शन होणार नाही आणि थंडीचा प्रभाव वाढेल
पावसासोबतच थंड वारेही वाहतील. पंजाब, हरयाणा, दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेशात २३ तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे या राज्यांचे किमान तापमानही २ ते ४ अंशांनी वाढू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…