सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले आहेत-प्रवीण दरेकर

  120



गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे. अशातच संजय राऊत हे स्वबळाचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होत की बँक चालवायला अक्कल लागते. मात्र, नारायण राणे यांनी जिल्हा बँक निवडणूक जिंकली, याचा अर्थ अक्कल कुठे आहे हे दिसते, असे म्हणत दरेकर यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय. सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रश्न विचारायला नाही तर उत्तर द्यायला अक्कल लागते असेही दरेकर म्हणाले.


हे सरकार नेमकं कोणासाठी काम करते. हे सरकार बिल्डर, दारू विक्रेत्यांसाठी काम करते का? असा सवाल यावेळी दरेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मोबदला कमी मिळावा यासाठी, भूसंपादन किंमत कमी केली जात आहे. यावरुन शेतकऱ्यांच्या विषयी सरकारच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत असल्याचे यावेळी दरेकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक सिनेकलाकार बोलत असतात त्यांना कोणी कामावरून काढले का? कोण हा किरण माने? असे दरेकर यावेळी म्हणाले. राजकारण करत इमोशनल स्टेटेजी पुढे केली जात आहे. यामध्ये भाजपचा काय संबंध अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी किरण माने प्रकरणावर दिली.


 

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.