सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले आहेत-प्रवीण दरेकर



गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे. अशातच संजय राऊत हे स्वबळाचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होत की बँक चालवायला अक्कल लागते. मात्र, नारायण राणे यांनी जिल्हा बँक निवडणूक जिंकली, याचा अर्थ अक्कल कुठे आहे हे दिसते, असे म्हणत दरेकर यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय. सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रश्न विचारायला नाही तर उत्तर द्यायला अक्कल लागते असेही दरेकर म्हणाले.


हे सरकार नेमकं कोणासाठी काम करते. हे सरकार बिल्डर, दारू विक्रेत्यांसाठी काम करते का? असा सवाल यावेळी दरेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मोबदला कमी मिळावा यासाठी, भूसंपादन किंमत कमी केली जात आहे. यावरुन शेतकऱ्यांच्या विषयी सरकारच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत असल्याचे यावेळी दरेकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक सिनेकलाकार बोलत असतात त्यांना कोणी कामावरून काढले का? कोण हा किरण माने? असे दरेकर यावेळी म्हणाले. राजकारण करत इमोशनल स्टेटेजी पुढे केली जात आहे. यामध्ये भाजपचा काय संबंध अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी किरण माने प्रकरणावर दिली.


 

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात