खेड (प्रतिनिधी) :खेड शहरातील जगबुडी नदीपात्रात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रात्री-अपरात्री फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नदीपात्र दूषित बनत चालले आहे. संबंधित विभाग अजूनही कारवाईसाठी पुढे सरसावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जगबुडी नदीपात्रात पोहण्यासह कपडे धुणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच जगबुडी नदीपात्रात तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे हे पात्र बकाल बनले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने कचरा फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तंबी दिल्यानंतर नदीपात्रात कचरा फेकणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. जगबुडी नदीपात्रात मगरीही मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांच्या मृत्यूचाही उलगडा अद्यापही झालेला नाही. मात्र नगर प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेनंतर जगबुडी नदीपात्र स्वच्छ होऊन जगबुडीने मोकळा श्वास टाकला होता.
मात्र गेल्या काही दिवसांपासून जगबुडी नदीपात्रात रात्री-अपरात्री कचरा फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. फळविक्रेत्यांसह चिकन विक्रेते नदीपात्रात कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र नगर प्रशासन अजूनही कारवाईसाठी पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कचऱ्यामुळे नदीपात्र पुन्हा बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…