नवी दिल्ली : भारतात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज ६.७ टक्के रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या २४ तासात २ लाख ६४ हजार २०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १ लाख ९ हजार ३४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १२ लाख ७२ हजार ७३ इतकी झाली आहे.
दिवसेंदिवस दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही वाढत असून ही चिंतेची बाब आहे. आज दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १४.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल तो ११ टक्क्यांवर होता. दुसऱ्या बाजुला ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात ५ हजार ७५३ जणांना कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
भारतात दिवसभरात कोरोनामुळे ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ४ लाख ८५ हजार ३५० जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…