गोव्यात आतापर्यंत १४ आमदारांचे राजीनामे

Share

पणजी : गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर ही राजकीय पक्षांसाठी मोठी समस्या बनली आहे. एकूण ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत आतापर्यंत १४ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर ३ राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे विलिनीकरण देखील झाले आहे. उपरोक्त १४ राजीनाम्यांपैकी सर्वाधिक राजीनामे पक्षांतरामुळे झाल्याची माहिती गोवा विधानसभेच्या सचिव नम्रता उलमन यांनी दिली.

यासंदर्भात उलमन म्हणाल्या की, गोवा विधानसभेत पक्षांतराच्या कारणास्तव सर्वाधिक आमदारांनी राजीनामे दिले आहेत. याशिवाय ३ राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची विलीनीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नम्रता या विधानसभेच्या पहिल्या महिला सचिव आहेत. त्यांच्याच कार्यकाळात सर्वाधिक आमदारांनी राजीनामे दिले. निवडणूक आयोगाने राज्यात निवडणुका जाहीर करत आचारसंहिता लागू केली आहे. आता पक्षांतरबंदी कायदा अधिक कडक झाल्याने एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करण्यासाठी आमदारांना राजीनामा देणे गरजेचे आहे. त्यानुसारच आतापर्यंत १४ आमदारांनी राजीनामे दिले. हे राजीनामे स्वीकारण्याचे काम सभापतींना करावे लागते. मात्र, त्यांच्या गैरहजेरीत हे काम सचिव करतात. सध्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे काम नम्रता उलमन यांना करावे लागत आहे.

राजीनामा देणाऱ्यांची यादी

विश्वजीत राणे : 16 मार्च 2017

सुभाष शिरोडकर : 16 ऑक्टोबर 2018

दयानंद सोपटे : 16 ऑक्टोबर 2018

लुईझींन फालेरो : 27 सप्टेंबर 2021

जयेश साळगावकर : 2 डिसेंबर 2021

रवी नाईक : 17 डिसेंबर 2021

रोहन खंवटे : 15 डिसेंबर 2021

एलिना साल्ढाणा : 16 डिसेंबर 2021

आलेक्स रेजिनाल्ड : 20 डिसेंबर 2021

कार्लुस आल्मेदा : 21 डिसेंबर 2021

प्रसाद गावकर : 9 जानेवारी 2022

मायकल लोबो : 10 जानेवारी 2022

प्रवीण झांट्ये : 10 जानेवारी 2022

गोविंद गावडे : 10 जानेवारी 2022

Recent Posts

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

1 minute ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

13 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

18 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

48 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

1 hour ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

1 hour ago