पश्चिम उपनगरातील पुलांची पालिका करणार पुनर्बांधणी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पालिकेकडून अनेक वर्षे रखडलेली कामे हाती घेण्यात येत असून मुंबईतील अनेक भागांमधील रखडलेली पादचारी पुलांची बांधकामे देखील हाती घेण्यात येत आहेत. दरम्यान पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि बोरीवलीमधील मोडकळीस आलेल्या पादचारी पुलांच्या जागेवर पुनर्बांधणी करणे तसेच दहिसरमध्येही एका पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या तिन्ही पादचारी पुलांसाठी पालिका सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करणार आहे.



मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा येथे पादचारी पूल बांधण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे कांदरपाडा येथे दहिसर नदीवर ६० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा प्रकारे नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. बोरीवली व कांदिवली येथे पादचारी पुलाची पुनर्बांधणी तर बोरीवली पूर्व येथील रतननगर पादचारी हे पूल मोडकळीस आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. हा पादचारी पूल रतननगर पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडतो. त्यामुळे या पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.


सुमारे १०० मीटर लांब व ३ मीटर रुंद असा हा पादचारी पूल आहे. कांदिवली पश्चिम येथील जोगेळेकर नाल्यावरील अस्तित्वात असलेले पादचारी पूल मोडकळीस आल्याने ते पाडण्यात आले आहेत. त्यामुळे या जागेवर १० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा प्रकारे उंची वाढवून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांच्या बांधकामासाठी विविध करांसह ४ कोटी ५२ लाख ५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण