‘केडीएमसीने २७ गावांवर लादलेला मालमत्ता कर रद्द करावा’

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावातील जनतेच्या मालमत्ता करात तब्बल दहा पटीने अधिक केलेली अवास्तव करवाढ रद्द करावी अशी विनंती राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.



याबाबत पाटील यांनी आणखी सूचित केले आहे की, या गावात जिल्हापरिषदेच्या शाळा असून महापालिका शिक्षण उपकर, शासकीय शिक्षण उपकर (निवासी) याच प्रमाणे गावांमध्ये मलप्रवाहाबाबत काहीही काम न करता मलप्रवाहकर आणि मलप्रवाह सुविधा लाभकर अशा प्रत्यक्षपणे काहीही न केलेल्या कामासाठी वेगवेगळ्या नावाने कर आकारणी केली जात आहे. या बरोबरीने पाणीपुरवठा लाभ कर, वृक्षसंवर्धन कर, पथकर अशा नावाखाली न दिलेल्या सुविधांची वसुली महापालिका करत आहे.



या आणि अशा अनेक समस्यांच्या निराकरणासाठी आणि शासनाचे लक्ष या अन्यायाकडे वेधण्यासाठी येथील भूमिपुत्रांसह जनतेने अनेकवेळा आंदोलने केलेली आहेत. २७ गावांचा विकास ही महापालिका करूच शकत नसल्याची खात्री येथील जनतेला झाली असल्याने २७ गावे कायमस्वरूपी वगळून त्याची वेगळी नगरपालिका व्हावी, या रास्त मागणीचा देखील महापालिका आणि प्रशासन यांनी खेळ मांडला आहे.

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या