‘केडीएमसीने २७ गावांवर लादलेला मालमत्ता कर रद्द करावा’

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावातील जनतेच्या मालमत्ता करात तब्बल दहा पटीने अधिक केलेली अवास्तव करवाढ रद्द करावी अशी विनंती राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.



याबाबत पाटील यांनी आणखी सूचित केले आहे की, या गावात जिल्हापरिषदेच्या शाळा असून महापालिका शिक्षण उपकर, शासकीय शिक्षण उपकर (निवासी) याच प्रमाणे गावांमध्ये मलप्रवाहाबाबत काहीही काम न करता मलप्रवाहकर आणि मलप्रवाह सुविधा लाभकर अशा प्रत्यक्षपणे काहीही न केलेल्या कामासाठी वेगवेगळ्या नावाने कर आकारणी केली जात आहे. या बरोबरीने पाणीपुरवठा लाभ कर, वृक्षसंवर्धन कर, पथकर अशा नावाखाली न दिलेल्या सुविधांची वसुली महापालिका करत आहे.



या आणि अशा अनेक समस्यांच्या निराकरणासाठी आणि शासनाचे लक्ष या अन्यायाकडे वेधण्यासाठी येथील भूमिपुत्रांसह जनतेने अनेकवेळा आंदोलने केलेली आहेत. २७ गावांचा विकास ही महापालिका करूच शकत नसल्याची खात्री येथील जनतेला झाली असल्याने २७ गावे कायमस्वरूपी वगळून त्याची वेगळी नगरपालिका व्हावी, या रास्त मागणीचा देखील महापालिका आणि प्रशासन यांनी खेळ मांडला आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत