‘केडीएमसीने २७ गावांवर लादलेला मालमत्ता कर रद्द करावा’

  58

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावातील जनतेच्या मालमत्ता करात तब्बल दहा पटीने अधिक केलेली अवास्तव करवाढ रद्द करावी अशी विनंती राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.



याबाबत पाटील यांनी आणखी सूचित केले आहे की, या गावात जिल्हापरिषदेच्या शाळा असून महापालिका शिक्षण उपकर, शासकीय शिक्षण उपकर (निवासी) याच प्रमाणे गावांमध्ये मलप्रवाहाबाबत काहीही काम न करता मलप्रवाहकर आणि मलप्रवाह सुविधा लाभकर अशा प्रत्यक्षपणे काहीही न केलेल्या कामासाठी वेगवेगळ्या नावाने कर आकारणी केली जात आहे. या बरोबरीने पाणीपुरवठा लाभ कर, वृक्षसंवर्धन कर, पथकर अशा नावाखाली न दिलेल्या सुविधांची वसुली महापालिका करत आहे.



या आणि अशा अनेक समस्यांच्या निराकरणासाठी आणि शासनाचे लक्ष या अन्यायाकडे वेधण्यासाठी येथील भूमिपुत्रांसह जनतेने अनेकवेळा आंदोलने केलेली आहेत. २७ गावांचा विकास ही महापालिका करूच शकत नसल्याची खात्री येथील जनतेला झाली असल्याने २७ गावे कायमस्वरूपी वगळून त्याची वेगळी नगरपालिका व्हावी, या रास्त मागणीचा देखील महापालिका आणि प्रशासन यांनी खेळ मांडला आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ

वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई

अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली मुंबई: मराठा आरक्षणाच्या

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील