‘केडीएमसीने २७ गावांवर लादलेला मालमत्ता कर रद्द करावा’

प्रशांत जोशी


डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावातील जनतेच्या मालमत्ता करात तब्बल दहा पटीने अधिक केलेली अवास्तव करवाढ रद्द करावी अशी विनंती राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.



याबाबत पाटील यांनी आणखी सूचित केले आहे की, या गावात जिल्हापरिषदेच्या शाळा असून महापालिका शिक्षण उपकर, शासकीय शिक्षण उपकर (निवासी) याच प्रमाणे गावांमध्ये मलप्रवाहाबाबत काहीही काम न करता मलप्रवाहकर आणि मलप्रवाह सुविधा लाभकर अशा प्रत्यक्षपणे काहीही न केलेल्या कामासाठी वेगवेगळ्या नावाने कर आकारणी केली जात आहे. या बरोबरीने पाणीपुरवठा लाभ कर, वृक्षसंवर्धन कर, पथकर अशा नावाखाली न दिलेल्या सुविधांची वसुली महापालिका करत आहे.



या आणि अशा अनेक समस्यांच्या निराकरणासाठी आणि शासनाचे लक्ष या अन्यायाकडे वेधण्यासाठी येथील भूमिपुत्रांसह जनतेने अनेकवेळा आंदोलने केलेली आहेत. २७ गावांचा विकास ही महापालिका करूच शकत नसल्याची खात्री येथील जनतेला झाली असल्याने २७ गावे कायमस्वरूपी वगळून त्याची वेगळी नगरपालिका व्हावी, या रास्त मागणीचा देखील महापालिका आणि प्रशासन यांनी खेळ मांडला आहे.

Comments
Add Comment

मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत

मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या

भीम यूपीआयद्वारे 'मुंबई वन' तिकिटांवर २० टक्के सवलत

एमएमआरडीएकडून ३१ डिसेंबरपर्यंत ऑफर मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यांच्या

आज मध्यरात्री कल्याण-बदलापूर दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई, विदर्भ,मराठवाड्यात थंडीची चाहूल

राज्यभरात तापमान कमी होणार मुंबई  : राज्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने