कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा

देवा पेरवी


पेण : पेण रेल्वे स्थानकात जलदगती गाड्यांना थांबा मिळावा या पेणकरांच्या मागणीला यश आले असून दिवा - रत्नागिरी - दिवा या पॅसेंजर गाडीला आता पेण बरोबरच आपटा, जिते व कासु रेल्वे स्थानकात थांबा मिळाला असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पेण येथील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला असून भाजप उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यानुसार १५ जानेवारीपासून दिवा - रत्नागिरी - दिवा ही पॅसेंजर रेल्वे गाडी पेण, जिते, आपटा, कासु व नागोठणे बरोबरच रोहा येथील स्थानकात थांबणार आहे. कोरोना काळात बंद असलेली मेमु गाडी सुरु करण्यासाठी देखील पेण मधील नागरिकांना संघर्ष करावा लागला होता.

पेण येथील रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे. रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती स्थानक असलेल्या पेण स्थानकात एकही जलदगती रेल्वे गाडीला थांबा नसल्याने पेण, वडखळ, अलिबाग, पोयनाड, मुरूड परिसरातील प्रवाशांना जलदगती गाडीसाठी पनवेल, कल्याण, कर्जत, लोणावळा व मुंबई येथे जावे लागत आहे. पेण रेल्वे स्थानकात जलदगती रेल्वेगाडीला थांबा मिळावा यासाठी ‘मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास संघर्ष समिती’ आणि पेण येथील रेल्वे प्रवाशांबरोबरच रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. वैकुंठ पाटील यांनी या बाबत तीन महिन्यांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील रेल्वे मुख्यालयात भेट घेऊन चर्चा करुन पेणच्या प्रवाशांच्या लेखी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या. याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले होते.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद