अवकाळीमुळे रब्बी पिकांना धोका

  129

पालघर (प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे.



पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात हरभरा, मूग, वाल, तीळ व अन्य रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. पण यंदा जिल्ह्याचे ऋतूचक्र बदलल्यामुळे शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अवकाळी पावसामुळे यंदा खरीप पिकाचेही अतोनात नुकसान झाले. तो अनुभव गाठीशी असल्यामुळे शेतकरी रब्बी पिकांची लागवड करण्यास मागे पुढे करत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वाल, हरभरा, तीळ व मूग इ. कृषी उत्पादने घेतली जातात. पण ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे.





रब्बी पिकावरही संक्रांत - शांताराम भोईर, वाडा



यंदा निसर्गाने पाठशिवणीचा खेळ चालवला आहे. अवकाळी पावसाने खरिपाच्या हंगामात धुमाकूळ घातला, आता पावसाळी वातावरणामुळे रब्बी पिकावरही संक्रांत आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी पार खचून गेले आहेत.




सध्याच्या वातावरणामुळे लागवड थांबवली- आत्माराम दुमाडा, विक्रमगड



दरवर्षी तीळ व हरभऱ्याच्या पिकाची लागवड करतो. पण सध्या असलेले वातावरण लक्षात घेऊन तूर्तास थांबलो आहे.



Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता