अवकाळीमुळे रब्बी पिकांना धोका

Share

पालघर (प्रतिनिधी) :पालघर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे.

पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात हरभरा, मूग, वाल, तीळ व अन्य रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. पण यंदा जिल्ह्याचे ऋतूचक्र बदलल्यामुळे शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अवकाळी पावसामुळे यंदा खरीप पिकाचेही अतोनात नुकसान झाले. तो अनुभव गाठीशी असल्यामुळे शेतकरी रब्बी पिकांची लागवड करण्यास मागे पुढे करत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वाल, हरभरा, तीळ व मूग इ. कृषी उत्पादने घेतली जातात. पण ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

रब्बी पिकावरही संक्रांत – शांताराम भोईर, वाडा

यंदा निसर्गाने पाठशिवणीचा खेळ चालवला आहे. अवकाळी पावसाने खरिपाच्या हंगामात धुमाकूळ घातला, आता पावसाळी वातावरणामुळे रब्बी पिकावरही संक्रांत आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी पार खचून गेले आहेत.

सध्याच्या वातावरणामुळे लागवड थांबवली- आत्माराम दुमाडा, विक्रमगड

दरवर्षी तीळ व हरभऱ्याच्या पिकाची लागवड करतो. पण सध्या असलेले वातावरण लक्षात घेऊन तूर्तास थांबलो आहे.

Recent Posts

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

3 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

4 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

5 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

5 hours ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

5 hours ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

6 hours ago