वडाळा येथील नियोजित रस्त्याला काँग्रेसचा विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने वडाळा पूर्व येथे नुरा बाजार ते शेख मिस्त्री दर्गा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या नियोजित रस्त्यामुळे १६८ घरे बाधीत होणार आहेत. त्यामुळे स्थानिक काँग्रेसचे नगरसेवक सुफीयान वनू यांनी या रस्त्याला विरोध केला आहे. दरम्यान त्यांनी या रस्त्याला एक पर्याय दिला असून त्यामुळे या रस्त्याचा पालिका प्रशासनाने पुनविर्चार करावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.



मुंबई पालिकेने शहरातील ६८ रस्ते विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे, तर काँग्रेस नगरसेवक सुफीयान वनू यांच्या प्रभाग क्र.१७९ मधील एक रस्ता विकसित करण्यात येणार आहे. हा रस्ता नुरा बाजाराकडून सुरू होऊन पुढे शेखमिस्त्री दर्ग्याला मिळतो. परंतु या रस्त्याच्या विकासादरम्यान १६८ घरे बाधित होणार आहेत. दरम्यान या बाबत ऑक्टोबर २०२१ मध्ये या रस्त्याचा सर्वे देखील झाला असून या रस्त्यास आपला विरोध नाही. परंतु रस्त्याच्या विकासांतर्गत तेथील १६८ घरे बाधित होणार आहेत व ती तोडावी लागणार आहेत. जर हा रस्ता उजव्या बाजूला वळवून घेतला तर तेथील केवळ १० ते १२ घरेच बाधित होणार आहेत व तो थेट एस.एम.डी. या मुख्य रोडला मिळणार आहे. प्रशासनाने या मुळ प्रकल्पाचा पुनविर्चार करावा, अशी मागणी वनू यांनी आक्टोबर २०२१ मध्ये स्थापत्य समिती (शहर) च्या सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करताना केली होती.


हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, महापालिकेला काही तांत्रिक अडचणीमुळे रस्ता अग्रवाल वाडीहून न्यायचा असल्यास सर्व बाधित घरांचे पुनर्वसन अँन्टॉपहिल मध्येच करण्यात यावे, अशीही मागणी वनू यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे