दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सोहेल कासकरला अमेरिकन एजन्सीने नार्को टेररिझम प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला भारतात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल कासकर हा आता पाकिस्तानात परतला आहे. अमेरिकन एजन्सीने सोहेल बरोबर अटक केलेल्या दानिश अलीला भारतात आणण्यात यश आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस सोहेलला भारतात आणण्याची तयारी करत होते. मात्र, भारतीय पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सोहेल हा दाऊद इब्राहिमचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. नूराचा 2010 मध्ये पाकिस्तानमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता.

अलीकडेच मुंबई पोलिसांना सोहेल कासकर हा दुबईमार्गे पाकिस्तानात परतल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी अमेरिकन एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुंबई पोलीस आणि अमेरिकन एजन्सी यांच्यात समन्वयाच्या अभावावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच अमेरिकेच्या एजन्सीने सोहेल कासकरला भारताकडे न सोपवता त्याला सोडून का दिले असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक