देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या २ लाखाच्या उंबरठ्यावर; ओमायक्रॉनचे ४,८६८ रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या आता २ लाखाच्या जवळ आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ९४ हजार ७२० इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत १५.८ टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना मृत्युंची संख्याही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ४४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दुसरीकडे, महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयांमधील ४८१ डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.


देशात काल कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ६८ हजार ०६३ इतकी होती. ही संख्या सोमवारच्या तुलनेत १२ हजारांनी कमी होती. पण आज कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली असून ती २ लाखाच्या जवळ गेली आहे. रुग्णसंख्या इतक्याच वेगाने वाढत राहिल्यास २ लाखाचा आकडाही ओलांडला जाऊ शकतो. कालच्या तुलनेत देशात आज २६ हजार ६५७ इतके अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.


दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,८६८ इतकी झाली आहे. यातील अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.

Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०