देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या २ लाखाच्या उंबरठ्यावर; ओमायक्रॉनचे ४,८६८ रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या आता २ लाखाच्या जवळ आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ९४ हजार ७२० इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत १५.८ टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना मृत्युंची संख्याही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ४४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दुसरीकडे, महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयांमधील ४८१ डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.


देशात काल कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ६८ हजार ०६३ इतकी होती. ही संख्या सोमवारच्या तुलनेत १२ हजारांनी कमी होती. पण आज कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली असून ती २ लाखाच्या जवळ गेली आहे. रुग्णसंख्या इतक्याच वेगाने वाढत राहिल्यास २ लाखाचा आकडाही ओलांडला जाऊ शकतो. कालच्या तुलनेत देशात आज २६ हजार ६५७ इतके अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.


दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,८६८ इतकी झाली आहे. यातील अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे