रत्नागिरी : पर्ससीन मासेमारीला बंदी असताना जिल्ह्यात काही बोटी खुलेआमपणे पर्ससीन मासेमारी करत असून अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होत असल्याचे समोर येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन मच्छीमारी सुरू व्हावी म्हणून मच्छीमारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
सागराच्या सुरक्षिततेसाठी कोस्टकार्ड, पोलीस आणि मत्स्य विभाग यांचा जागता पाहारा असतो. त्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत असते. परंतु आपल्या जॉबच्या बाहेर जाऊन कोणतेही कार्य करणार नाही, असा अलिखित नियम हे अधिकारी बजावतात की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पर्ससीन मच्छीमारी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची मच्छीमारी संकटात येते म्हणूनच या मच्छीमारीला विरोध केला जात आहे; परंतु शासनाची धूळफेक करत मोठ्या प्रमाणात पर्ससीन मच्छीमारी सुरू असून यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…