उपनगरातील बेस्टचे बसथांबे बदलणार

मुंबई :मुंबईतील पश्चिम उपनगरातील १०५ बस थांबे बदलण्यात येणार असून जिल्हा नियोजन समितीच्या निधितून हा बदल करण्यात येणार आहे. उपनगरात अनेक बस थांब्याना बसण्याची सोय नाही. मात्र आता नवीन बस थांब्यावर बसण्याची देखील व्यवस्था असेल. त्याचबरोबर कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे रेल्वेप्रमाणे बेस्टने देखील लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. पण यापुढे बसचालकांसाठी देखील लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.



बेस्ट ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असून रोज २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून या बसथांब्यांचा विकास केला जाणार असून यासाठी नियोजन विभागाने निविदा मागवल्या आहेत. कमीत कमी जागा व्यापणाऱ्या या बसथांब्यासाठी पावणेनऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या काही बस थांबे गर्दुल्ले, भिकारी यांचा अड्डा झाला आहे. मात्र आता त्यांना हटवून या थांब्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
कोरोनाचे नियम कडक



कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेप्रवास बंद असताना बेस्टने मुंबई आणि मुंबईच्या बाहेरही सेवा दिली होती. मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बेस्ट उपक्रमाकडून देखील नियम कडक करण्यात आले आहेत. काही दिवसांपासून बेस्ट उपक्रमाने बस आगारातील प्रवाशांच्या युनिवर्सल पासची तपासणी सुरू केली आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच केवळ बेस्टने बसने प्रवास करता येणार आहे. मात्र आता प्रवाशांसोबत चालकही लसीचे दोन डोस घेतलेला असला पाहिजे. ज्या बस चालकाचे लसीचे दोन डोस घेतलेले नाहीत, अशा चालकाला बस चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ बसचालकच नव्हे, तर वाहक, तिकीट तपासनीस व इतर कर्मचारी अशा सर्वांनीच दोन डोस घेणे बेस्ट प्रशासनाने बंधनकारक केले आहे.




या ठिकाणचे बस थांबे बदलणार



ओशिवरा - १५, गोवंडी - १३, देवनार - ११ तर गोरेगाव - १० सर्वाधिक बसथांबे बदलण्यात येणार आहे. तर अन्य ठिकाणांमध्ये कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, सांताक्रुझ,

Comments
Add Comment

मुंबईतील दस्त नोंदणीसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने मुंबईतील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठी 'दिवाळी भेट' दिली आहे. यापुढे

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासमोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर! मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ! महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या