नालासोपारा : विरारमध्ये खोदकाम करताना एक जलवाहिनी फुटली होती. त्याला सहा महिने उलटले तरी स्थिती अद्याप जैसे थेच आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय यानिमित्त विरारच्या नागरिकांना येत आहे.
विरारच्या अनेक भागात, विशेषत: पूर्वेकडील भागात अद्यापही पाण्याची समस्या गंभीर आहे. या भागातील अनेक मागासलेले पाडे आहेत, ज्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पालिकेचे पाणी पोहोचत नाही. तर दुसरीकडे विरार पश्चिमेला एक जलवाहिनी फुटली असून गेल्या अनेक महिन्यांपासून पालिका प्रशासनाला त्याचे भानच नाही. खोदकाम करताना फुटलेल्या या जलवाहिनीतील पाणी वाहून थेट गटारात जात आहे. आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. विशेष म्हणजे, याबाबत तक्रार करून देखील पालिकेने याची दुरुस्ती केलेली नाही.
विरार पश्चिमेतील रेल्वे फाटकानजीक सुमारे सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने रस्त्याचे खोदकाम केले होते. हे काम सुरू असताना रस्त्याखालील पाण्याची जलवाहिनी फुटली, तेव्हापासून आतापर्यंत अनेक महिने या जलवाहिनीतून पाणी वाहून थेट गटारात जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार देखील केली आहे. मात्र तरीही पालिकेकडून जलवाहिन्यांची दुरुस्ती केली जात नाही. पालिका प्रशासन पाणीप्रश्नाबाबत असा हलगर्जीपणा कसा करू शकते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…