राज्यात तिसऱी लाट सुरु -राजेश टोपे

  80

जालना-‘राज्यात तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही.पण जानेवारी अखेरपर्यंत रुग्णसंख्येचा उच्चांक गाठून तोपर्यंत ही लाट कायम राहील’ असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राजेश टोपे हे सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.



टोपे पुढे म्हणाले, ‘राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचे आहे. आज आपण बघतो आहोत की काल ४५ हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? हे ठाऊक नाही. जसे दुसऱ्या लाटेत दररोज ६५ हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता. तसे या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती बाधित रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असे वाटते. त्यानंतर तो खाली जाईल असेही तज्ज्ञांचे मत आहे’. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील असे म्हटले आहे.


राजेश टोपे पुढे म्हणाले की, सध्या राज्यात १ हजार ७११ रुग्ण आसीयूमध्ये आहेत. त्यातील ८५ टक्के रुग्णांना कुठलीही लक्षण नाहीत. तसंच राज्यात एक लाख ७३ हजार रुग्ण अँक्टिव्ह आहेत. त्यामुळे सध्या टेस्टिंग वाढवण्यावर राज्य सरकारचा भर आहे. जिथे लसीकरण जास्त आहे तिथे मृ-त्यूचं प्रमाण कमी आहे.  औरंगाबदमध्ये लसीकरणच प्रमाण कमी आहे.


 देशातल्या सर्व राज्यांमध्ये क्वारंटाईनचा कालावधी हा सात दिवसाचाच आहे. महाराष्ट्रातही सात दिवसाचाच क्वारंटाईनचा कालावधी आहे आणि फेब्रुवारीनंतर कोरोनाची लाट ओसरेल असा विश्वासही राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला. 


सध्या राज्यात १३ टक्के लोकांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर सध्या अतिरिक्त ताण नाही. सध्या लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे. लस घेतलेल्यांना सौम्य लक्षण दिसून येतात.  कोरोनाशी लढा देण्यासाठी  जिल्हा स्तरावर  होम आयसोलेशन किट तयार करणार असल्याचंदेखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 


 





Comments
Add Comment

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या