राज्यात कायदा - सुव्यवस्थेचे धिंडवडे

  123

नाशिक  :‘लोकांना पोलिसांचा आधार मिळत नसून गुंडांचा धाक वाटत आहे. त्यामुळे गुन्हे रोखण्याबाबत नागरिकही बघ्याची भूमिका घेत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था यांचे धिडवडे निघाले आहेत. गायब होणाऱ्या महिलांचे नेमके काय होते? याचे उत्तर सरकार व पोलिसांनी द्यावे. सरकार निष्क्रिय असल्याने राज्यातील महिला अत्याचाराचे जीवन जगत आहेत,’असा घणाघात भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी केला. आपल्या दौऱ्यावेळी त्यांनी त्रंबकेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी महामृत्युंजय जप केला.वसंतस्मृती या भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश पॅनलिस्ट लक्ष्मण सावजी, पवन भगूरकर, सुनील बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.


10
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘राज्यात अपहरणाच्या घटना या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ही चिंतेची बाब असून राज्यात पोलीस आयुक्त ते मुख्यमंत्री हे सगळेच गायब होत आहेत.राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नसून कायद्याची अंमलबाजवणी करणारे कमजोर झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत असल्याची टीका करताना वाघ यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार अस्तित्वात आहे की नाही, याबाबतच आता सशंकता वाटत असल्याची टीका यावेळी वाघ यांनी केली. सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असून विकृतांमध्ये आपले कोणीही वाकडे करू शकत नाही हा भाव निर्माण झाला असल्याचे त्या म्हणल्या.



त्रंबकेश्वर येथील खरशेत येथील वनवासी महिलांना पाण्यासाठी होत असलेल्या अडचणींची माहिती त्यांनी घेतली. तसेच, तेथे साकव बांधण्यात आल्यामुळे तेथील तात्पुरती गरज आदित्य ठाकरे यांनी भागवली असली तरी, तेथे वरील बाजूस एक सक्षम पूल बांधला जावा अशी मागणी यावेळी वाघ यांनी केली. त्रंबकेश्वर व आसपासच्या भागातील प्रश्न हे महत्वाचे असून रस्ते, अंगणवाडी इमरात बांधकाम नसणे, आरोग्य सुविधेची असणारी वानवा, शवविच्छेदनासाठी नसणारी सुविधा, तेथे ५० टक्के लोकांना खावटी अनुदान देण्यात आलेले नसल्याचे यावेळी वाघ यांनी सांगितले. याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्यातील वनवासी बहुल जिल्ह्यात व क्षेत्रात वनवासींची परवड होत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. अशा प्रकारचा भोंगळ कारभार महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की