सतर्कतेमुळे अनर्थ टळला : पालकमंत्री भुसे

  106

पालघर  : माहिम केळवे धरण ढासळल्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच आवश्यकतेनुसार एनडीआरएफचे पथक सुद्धा तैनात करण्यात आले होते. परिसरातील गावांमधील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची तयारी सुद्धा जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यामुळे अनर्थ टळला, असे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.



झांझरोळी गावाजवळ माहिम केळवे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या धरणात गळती झाली होती. या गळती प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी केली व वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, आ. राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



धरणाची गळती होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनला आपातकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात धरण अधिक सुरक्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सध्या धरणामध्ये २.४६ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ०.५० द.ल.घ.मी. पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवून २.०० द.ल.घ.मी. पाणीसाठा मार्च अखेरपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



सद्यस्थितीत धरणाच्या अन्य भागातून पाणी सोडण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, याविषयी काळजी घेण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते