बांबू व्यवसायावर संकट

संदीप जाधव


बोईसर : दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर वाढल्याने बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू कालबाह्य होत आहेत. त्यामुळे बांबू व्यवसायावर संकट आले आहे. त्यातच कोरोनामुळे सततचे बदलणारे निर्बंध, बांबू पुरवठ्याचा अभाव यामुळे देखील या व्यवसायातील अडचणीत भर पडली आहे. या व्यवसायिकांना सुप, टोपले बनविण्याकरिता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. परंतु वस्तु विक्रीपासून मिळणारा मोबदला अत्यल्प असतो.
हा व्यवसाय करणारे कारागिर ओल्या बांबूपासून चटया, टोपल्या, सूप, परडी व ढोल्या अशा विविध वस्तू तयार करतात. त्यामुळे ग्रामीण लोकांची धान्य व वस्तूंची साठवणूक करण्याची पूर्तता होते. या व्यवसायातील कामगार ग्रामीण भागातील बेटेगाव, नागझरी येथील आठवडी बाजारात त्यास वस्तूंची विक्री करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाचे पिढी दर पिढीकडून मिळालेल्या प्रशिक्षणातून अपार कष्ट करून बनविलेल्या वस्तूंची विक्री करताना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने आमच्या भविष्याचा विचार करून आम्हाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी आठवडी बाजारात विक्रीसाठी आलेल्या कारांगिरांकडून करण्यात येत आहे.


बोईसर पूर्वेला पूर्वी बांबूचे घनदाट जंगल होते. त्यामुळे अल्पकिमतीत बाबू मिळत होते. परंतु अलीकडे सर्वत्र शासनाने पलाटे (प्लॉट) वाटप केल्याने त्यात ओले बांबू मिळणे कठीण झाले आहे. शिवाय बाजारात प्लास्टिकच्या विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जरी अप्रतिम सौंदर्यपूर्ण बांबूपासून बनविलेल्या या वस्तू असल्या तरी त्या स्वस्त दराने विकाव्या लागतात. यामुळे कामगारांना वेळप्रसंगी अर्धापोटी उपाशी रहावे लागते आहे, हेच सत्य आहे.
Comments
Add Comment

Anil Ambani : अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; ईडीनंतर सीबीआयकडून कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम सुरु

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआयने मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंदवला

महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या