राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी

  145

अहमदनगर :- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अहमदनगर कार्यालयांतर्गत एन.एच. ६१ महामार्गाची मोठी दुरावस्था झाली असून, अनेकांचे अपघात होऊन बळी जात असताना त्वरीत रस्ता दुरुस्तीचे कामे मार्गी लावावे व या रस्त्याच्या निकृष्ट कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केंद्रीय रस्ते,वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा सोमवार १० जानेवारी पासून शहरातील सहकार सभागृह येथील उपप्रबंधक तांत्रिक प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अहमदनगर कार्यालयांतर्गत माळशेज घाट एन.एच. ६१ या रस्त्यावर १०१ ते २११ किलोमीटर आंतर करिता कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. ऑगस्ट २०१४ साली या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या महामार्गाची काही वर्षातच मोठी दुरवस्था झाली असून, अद्यापही दुतर्फा साईड पट्ट्या, मुरूम फिलिंगचे काम झालेले नाही. महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना दोन वर्षापासून पुरेशे पाणी न मिळाल्याने त्यांची वाढ झाली नसून, काही झाडे जळाली आहेत. भाळवणी गाव ते ढवळपुरी फाटा या अंतरावर ५० ते ६० लोकांची अपघाती मृत्यू झाले आहे.


हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्या च्या दुतर्फा साईडपट्टीवर मुरूम टाकलेला नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.४ नोव्हेंबर २०२० रोजी सदर प्रश्नांसाठी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. विनंती पत्रावरून रास्तारोको स्थगित करण्यात आले. परंतु अद्याप कामाची पूर्तता करण्यात आलेली नाही.


महामार्गावरील लहान-मोठे पूला खाली व शेजारी वाढलेले गवत, झाडे झुडपांमुळे तसेच महामार्गाच्या दुतर्फा झालेल्या अतिक्र मण वाहतुकीस अडथळा होत आहे. या महामार्गाच्या कामात अनियमितता असून, निष्काळजीपणामुळे अनेकांचा जीव गेलेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आनण्या साठी वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, त्वरित सदर रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टयांवर मुरुम टाकण्यात यावे, बस स्टॅन्ड पेंटिंगचे काम करुन कापरी चौकात हायमॅक्स बसवावा, रस्त्यावरील प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ