नवी मुंबईत प्रकाश रथ ठरतोय नाका कामगारांसाठी देवदूत

  135

नवी मुंबई : नेत्र हे मानवी शरीरातील खूप महत्वाचे अवयव आहेत. त्यात जर काही विकार झाला, तर त्याची झळ स्वतःवर तर होतेच, पण आयुष्यावरही विपरीत परिणाम होतो. असे होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून घणसोली येथील यंग नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत थोरात मागील दहा वर्षांपासून नवी मुंबईतील विविध नाक्यावर जाऊन नाका कामगारांची विनामूल्य डोळे तपासणी करत आहेत.
त्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर केला आहे. तसेच इतरही काही आजार असतील, तर त्याबाबतही मार्गदर्शन करत आहेत. आजतागायत त्यांनी हजारो रुग्ण विनामूल्य तपासून चष्मे देखील वाटप केले आहेत.



डॉ. प्रशांत थोरात यांनी तीन वर्षांपूर्वी एक वाहन खरेदी केले. या वाहनाला प्रकाश रथ नाव दिले. या प्रकाश रथात नेत्र तपासणी संदर्भातील सर्व सामुग्री उपलब्ध आहे.



नवी मुंबईत एकूण दहा कामगार नाके आहेत. या नाक्यांवर अस्थिर मजूर, सुतार, गोवंडी असे कामगार पोटासाठी काम मिळेल म्हणून येत असतात. त्यांची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याने डोळ्यांच्या समस्या असल्या तरी ते काम करत असतात. आजतागायत एकूण दहा हजार नाका कामगारांची तपासणी करून चष्मे देखील विनामूल्य वाटप करण्यात आले आहेत.
गरजूना मदतीचा हात दिल्यानंतर आत्मिक समाधान मिळत असल्याचे, डॉ. प्रशांत थोरात, नेत्र रोग तज्ज्ञ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या