नवी मुंबई : नेत्र हे मानवी शरीरातील खूप महत्वाचे अवयव आहेत. त्यात जर काही विकार झाला, तर त्याची झळ स्वतःवर तर होतेच, पण आयुष्यावरही विपरीत परिणाम होतो. असे होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून घणसोली येथील यंग नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत थोरात मागील दहा वर्षांपासून नवी मुंबईतील विविध नाक्यावर जाऊन नाका कामगारांची विनामूल्य डोळे तपासणी करत आहेत.
त्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर केला आहे. तसेच इतरही काही आजार असतील, तर त्याबाबतही मार्गदर्शन करत आहेत. आजतागायत त्यांनी हजारो रुग्ण विनामूल्य तपासून चष्मे देखील वाटप केले आहेत.
डॉ. प्रशांत थोरात यांनी तीन वर्षांपूर्वी एक वाहन खरेदी केले. या वाहनाला प्रकाश रथ नाव दिले. या प्रकाश रथात नेत्र तपासणी संदर्भातील सर्व सामुग्री उपलब्ध आहे.
नवी मुंबईत एकूण दहा कामगार नाके आहेत. या नाक्यांवर अस्थिर मजूर, सुतार, गोवंडी असे कामगार पोटासाठी काम मिळेल म्हणून येत असतात. त्यांची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याने डोळ्यांच्या समस्या असल्या तरी ते काम करत असतात. आजतागायत एकूण दहा हजार नाका कामगारांची तपासणी करून चष्मे देखील विनामूल्य वाटप करण्यात आले आहेत.
गरजूना मदतीचा हात दिल्यानंतर आत्मिक समाधान मिळत असल्याचे, डॉ. प्रशांत थोरात, नेत्र रोग तज्ज्ञ यांनी सांगितले.
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…