दावे निकाली काढण्यात एलआयसी तिसऱ्या स्थानी

मुंबई  :आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये दावे निकालात काढण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या काळात एलआयसीने ९० टक्क्यांहून अधिक दावे निकाली काढले आहेत. विमा नियामक आणि िवकास प्राधिकरणाने (इरडा) याबाबतचा अहवाल जारी केला आहे.

या अहवालानुसार आयुर्विम्याचे ११ लाख दावे विमा कंपन्यांकडे आले. त्यापैकी १० लाख ८४ हजार दावे निकाली काढण्यात आले. या दाव्यांपैकी २६,४२२ कोटी रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली. तर, ९ हजार ५२७ दावे फेटाळून लावण्यात आले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ३१ मार्च २०२१ पर्यंत ९८.६२ टक्के दावे निकाली काढले. २०१९-२० या आर्थिक वर्षात दावे निकाली काढण्याचे हे प्रमाण ९६.६९ टक्के होते.

खासगी विमा कंपन्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ९७.०२ टक्के दावे निकाल काढले. तर, २०१९-२० या आर्थिक वर्षात हेच प्रमाण ९७.१८ टक्के होते.


विमा दावे निकाली काढण्याचे प्रमाण


मॅक्स लाइफ : ९९.३५%
एगॉन : ९९.२५%
भारती अक्सा : ९९.०५%
एलआयसी : ९८.६२%
Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व