या अहवालानुसार आयुर्विम्याचे ११ लाख दावे विमा कंपन्यांकडे आले. त्यापैकी १० लाख ८४ हजार दावे निकाली काढण्यात आले. या दाव्यांपैकी २६,४२२ कोटी रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली. तर, ९ हजार ५२७ दावे फेटाळून लावण्यात आले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ३१ मार्च २०२१ पर्यंत ९८.६२ टक्के दावे निकाली काढले. २०१९-२० या आर्थिक वर्षात दावे निकाली काढण्याचे हे प्रमाण ९६.६९ टक्के होते.
खासगी विमा कंपन्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ९७.०२ टक्के दावे निकाल काढले. तर, २०१९-२० या आर्थिक वर्षात हेच प्रमाण ९७.१८ टक्के होते.
विमा दावे निकाली काढण्याचे प्रमाण
मॅक्स लाइफ : ९९.३५%
एगॉन : ९९.२५%
भारती अक्सा : ९९.०५%
एलआयसी : ९८.६२%