दावे निकाली काढण्यात एलआयसी तिसऱ्या स्थानी

मुंबई  :आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये दावे निकालात काढण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या काळात एलआयसीने ९० टक्क्यांहून अधिक दावे निकाली काढले आहेत. विमा नियामक आणि िवकास प्राधिकरणाने (इरडा) याबाबतचा अहवाल जारी केला आहे.

या अहवालानुसार आयुर्विम्याचे ११ लाख दावे विमा कंपन्यांकडे आले. त्यापैकी १० लाख ८४ हजार दावे निकाली काढण्यात आले. या दाव्यांपैकी २६,४२२ कोटी रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली. तर, ९ हजार ५२७ दावे फेटाळून लावण्यात आले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ३१ मार्च २०२१ पर्यंत ९८.६२ टक्के दावे निकाली काढले. २०१९-२० या आर्थिक वर्षात दावे निकाली काढण्याचे हे प्रमाण ९६.६९ टक्के होते.

खासगी विमा कंपन्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ९७.०२ टक्के दावे निकाल काढले. तर, २०१९-२० या आर्थिक वर्षात हेच प्रमाण ९७.१८ टक्के होते.


विमा दावे निकाली काढण्याचे प्रमाण


मॅक्स लाइफ : ९९.३५%
एगॉन : ९९.२५%
भारती अक्सा : ९९.०५%
एलआयसी : ९८.६२%
Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या