मिलिंद पळसुले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद दिवाकर पळसुले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्राप्त झाला असून नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पळसुले यांनी दोन वर्षांच्या कोरोना काळात आपल्या पदाला साजेसे असे चांगले काम करून भिवंडी शहरातील सर्व प्रभाग समितीमधील तसेच इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व शहरातील अनेक कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली व त्या संधीचा त्यांनी दुरुपयोग न करता चांगल्या प्रमाणात सर्व डॉक्टर, परिचारिका व अधिकारी आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर व सर्व नगरसेवक यांच्यासोबत राहून चांगले काम केले. त्यामुळे त्यांचा महानगरपालिकेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुवनेश्वरच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार डॉ. मनीलाल शिंपी, डायरेक्टर तथा महाराष्ट्र राज्याचे राजदूत म. गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुवनेश्वर, डॉ. किशोर पाटील, संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोकण विभाग सरचिटणीस, भिवंडी पंचायत समितीचे उप सभापती एकनाथ पाटील, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी माधव वाघमारे, भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी आरएसपी अधिकारी जितेंद्र सोनवणे, आरएसपी अधिकारी शरद बोरसे, तसेच ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ कुंभार, शरद भसाले, संजय भोईर, संतोष चव्हाण, राजेंद्र काबाडी, आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment

ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन

नको सुट्ट्या पैशाची कटकट... तिकीट काढा झटपट...!

एसटीच्या यूपीआयमार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)

दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा

राज्यातील २९ लाख विद्यार्थी अपार आयडी नोंदणीविना

मुंबई : राज्यातील सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके आणि तीन डेपो

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा माऊंटन टनेल-५ च्या यशस्वी कामामुळे ठाणे आणि अहमदाबाद

मुंबईत माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील माजी आमदार, अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचे