राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार, ७०० मेट्रीक टन ऑक्सिजन लागल्यास पूर्ण लॉकडाऊन

मुंबई : मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत काही अनावश्यक गोष्टींवर निर्बंध लावावे लागतील. महापालिकेच्या वतीने काही कडक निर्बंध लागू शकतात. मुंबईत जीवनावश्यक वस्तू सोडून नाईट कर्फ्यू लावता येईल का? याबाबत सध्या विचार सुरू आहे. रात्रीच्या फिरण्यावर, हॉटेलिंगवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. गरज असल्यास रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव आहे, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.


राज्यातील ६० लाख मुलांचे लसीकरण करायचे आहे. दररोज ३ लाख मुलांचे लसीकरण याप्रमाणे प्रयत्न करत आहोत. १५ ते २० दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचे असेल, कुठे जायचे असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक केली आहे. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असे आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केले आहे.


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होती. पण, नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं आणखी बंद होतील का? अशी भीती आहे. त्याबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले असून सर्वच धार्मिक स्थळांवर गर्दी टाळावी लागेल. सर्वत्र गर्दी टाळण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला कडक लॉकडाऊन करायचे नाही. पण, गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या