वैजनाथमधील अनधिकृत बांधकामांवर लवकर हातोडा

  92

ज्योती जाधव


कर्जत : गेल्या अनेक महिन्यांपासून वादात अडकलेल्या वैजनाथ ग्रामपंचायत हद्दीमधील नदीच्या बाजूला केलेल्या अनधिकृत बांधकामांवर लवकर जेसीबी फिरविला जाणार असल्याची माहिती उपअभियंता भारत गुंटूरकर यांनी दिली आहे.



स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या संगनमताने नदीच्या बाजूला उभारलेल्या बंगल्याला नदीमुळे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित प्रशासनाची परवानगी न घेता बंगल्याच्या संरक्षणासाठी नदीमध्ये भिंत उभारण्याचे काम नाखवा यांनी केले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी पाटबंधारे विभागाकडे सतत पाठपुरावा केला आणि पाटबंधारे विभागाने पाहणी करून संबंधित मालकाला तीन वेळा नोटीस काढण्यात आली. तरीदेखील संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा न दिल्याने अखेर पंधरा दिवसात बांधकाम हटविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे


तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देण्यात येणार असून पोलीस बंदोबस्ताची मागणी करणार असल्याचे या वेळी उपअभियंता गुंटूरकर यांनी सांगितले. तसेच नाखवा यांनी नियमानुसार पूरनियंत्रणाची जागा सोडून बांधकाम करणे अपेक्षित असताना त्यांनी नदीमध्येच बांधकाम केल्याने ती भिंत तोडण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत