कर्जत : गेल्या अनेक महिन्यांपासून वादात अडकलेल्या वैजनाथ ग्रामपंचायत हद्दीमधील नदीच्या बाजूला केलेल्या अनधिकृत बांधकामांवर लवकर जेसीबी फिरविला जाणार असल्याची माहिती उपअभियंता भारत गुंटूरकर यांनी दिली आहे.
स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या संगनमताने नदीच्या बाजूला उभारलेल्या बंगल्याला नदीमुळे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित प्रशासनाची परवानगी न घेता बंगल्याच्या संरक्षणासाठी नदीमध्ये भिंत उभारण्याचे काम नाखवा यांनी केले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी पाटबंधारे विभागाकडे सतत पाठपुरावा केला आणि पाटबंधारे विभागाने पाहणी करून संबंधित मालकाला तीन वेळा नोटीस काढण्यात आली. तरीदेखील संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा न दिल्याने अखेर पंधरा दिवसात बांधकाम हटविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देण्यात येणार असून पोलीस बंदोबस्ताची मागणी करणार असल्याचे या वेळी उपअभियंता गुंटूरकर यांनी सांगितले. तसेच नाखवा यांनी नियमानुसार पूरनियंत्रणाची जागा सोडून बांधकाम करणे अपेक्षित असताना त्यांनी नदीमध्येच बांधकाम केल्याने ती भिंत तोडण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…