वैजनाथमधील अनधिकृत बांधकामांवर लवकर हातोडा

ज्योती जाधव


कर्जत : गेल्या अनेक महिन्यांपासून वादात अडकलेल्या वैजनाथ ग्रामपंचायत हद्दीमधील नदीच्या बाजूला केलेल्या अनधिकृत बांधकामांवर लवकर जेसीबी फिरविला जाणार असल्याची माहिती उपअभियंता भारत गुंटूरकर यांनी दिली आहे.



स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या संगनमताने नदीच्या बाजूला उभारलेल्या बंगल्याला नदीमुळे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित प्रशासनाची परवानगी न घेता बंगल्याच्या संरक्षणासाठी नदीमध्ये भिंत उभारण्याचे काम नाखवा यांनी केले होते. या संदर्भात तक्रारदार यांनी पाटबंधारे विभागाकडे सतत पाठपुरावा केला आणि पाटबंधारे विभागाने पाहणी करून संबंधित मालकाला तीन वेळा नोटीस काढण्यात आली. तरीदेखील संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा न दिल्याने अखेर पंधरा दिवसात बांधकाम हटविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे


तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र देण्यात येणार असून पोलीस बंदोबस्ताची मागणी करणार असल्याचे या वेळी उपअभियंता गुंटूरकर यांनी सांगितले. तसेच नाखवा यांनी नियमानुसार पूरनियंत्रणाची जागा सोडून बांधकाम करणे अपेक्षित असताना त्यांनी नदीमध्येच बांधकाम केल्याने ती भिंत तोडण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : "हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये"; भाजपचे नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती प्रहार

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (UBT)

इच्छुकांची विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी महापालिका आणि पोलिसात धावाधाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता मंगळवारी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल

वांद्रे पूर्व स्कायवॉकचा खर्च १७ कोटींनी वाढला, जलवाहिनी आणि पर्जन्य जलवाहिनींमुळे वाढला खर्च

एका सरकत्या जिन्याचे बांधकाम केले रद्द मुंबई ( सचिन धानजी) : वांद्रे पूर्व येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या

पवार कुटुंबाला दिलासा; लवासा प्रकरणी दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ

Maharashtra Municipal Elections 2026 : महापालिका रणसंग्रामाला आजपासून प्रारंभ; २९ शहरांत अर्ज भरण्याची लगबग, राजकीय समीकरणांचा पेच कायम

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचा महासंग्राम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुंबईसह

भाजपची मुंबईतील बूटपॉलिशवाल्यांनाही साद

महापालिका निवडणूक प्रचाराचे अभिनव ‘फंडे’ मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकाच नव्हे, तर