आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट नियमांमध्ये बदल

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनमध्ये बदल केला आहे.
या बदलातर्गत, गोलंदाजी संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करावा लागेल. संघ निर्धारित वेळेपेक्षा मागे राहिला, तर उर्वरित षटकांमध्ये, त्याचा एक क्षेत्ररक्षक ३० यार्डबाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला आत राहावे लागेल. अशा स्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला तोटा सहन करावा लागू शकतो. सध्या, पॉवरप्लेनंतर ३० मीटर यार्ड वर्तुळाबाहेर ५ क्षेत्ररक्षक असतात. मात्र नवीन नियमांनंतर केवळ ४ क्षेत्ररक्षक यार्डबाहेर राहू शकणार आहेत.

याशिवाय द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक डावात अडीच मिनिटांचा ऐच्छिक ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी सहमती दर्शवली तरच हे लागू होईल. टी-ट्वेन्टी क्रिकेटमधील बदलांशी संबंधित हे नियम वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या एकमेव सामन्यापासून लागू होतील. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १८ जानेवारीपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या महिलांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत नवीन नियम पहिल्यांदाच अमलात येईल.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या द हंड्रेड क्रिकेट लीग अर्थात ईसीबीमध्ये असा नियम यशस्वीपणे वापरल्यानंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सर्व फॉरमॅटमध्ये खेळाचा वेग सुधारण्यासाठी असे करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

द. आफ्रिकेविरुद्ध रोहित-विराट खेळणार नाही?

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात

द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी 'शुभमन सेना' सज्ज; ऋषभ पंतचे पुनरागमन निश्चित

मुंबई : भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने दक्षिण

मिचेल सँटनर, जेकब डफीची विक्रमी भागीदारी

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. जिथे पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली आहे.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांचा 'कार वॉश' रोमांस; किसिंग व्हिडीओने सोशल मीडियावर लावली आग!

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वन डे विश्वचषक 2025 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचे नाव जगभरात गौरवाने

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील