आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेट नियमांमध्ये बदल

  81

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनमध्ये बदल केला आहे.
या बदलातर्गत, गोलंदाजी संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करावा लागेल. संघ निर्धारित वेळेपेक्षा मागे राहिला, तर उर्वरित षटकांमध्ये, त्याचा एक क्षेत्ररक्षक ३० यार्डबाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला आत राहावे लागेल. अशा स्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला तोटा सहन करावा लागू शकतो. सध्या, पॉवरप्लेनंतर ३० मीटर यार्ड वर्तुळाबाहेर ५ क्षेत्ररक्षक असतात. मात्र नवीन नियमांनंतर केवळ ४ क्षेत्ररक्षक यार्डबाहेर राहू शकणार आहेत.

याशिवाय द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक डावात अडीच मिनिटांचा ऐच्छिक ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी सहमती दर्शवली तरच हे लागू होईल. टी-ट्वेन्टी क्रिकेटमधील बदलांशी संबंधित हे नियम वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या एकमेव सामन्यापासून लागू होतील. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १८ जानेवारीपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या महिलांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत नवीन नियम पहिल्यांदाच अमलात येईल.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या द हंड्रेड क्रिकेट लीग अर्थात ईसीबीमध्ये असा नियम यशस्वीपणे वापरल्यानंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. सर्व फॉरमॅटमध्ये खेळाचा वेग सुधारण्यासाठी असे करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र