सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे हस्तांतरण

मुंबई  : संकल्प सिद्धी ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र सचिव दिव्या ढोले यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून मुंबई पोलीस परिमंडळ ९ क्षेत्रातील वर्सोवा व ओशिवरा पोलीस स्थानकांतर्गत अति संवेदनशील ठिकाणांवर "सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व्हेलिअन्स यंत्रणा" लावून कार्यान्वित करण्यात आली आहे. संस्थेकडून या सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे अधिकृत हस्तांतरण मुंबई पोलीस परिमंडळ ९ चे उप आयुक्त मंजुनाथ शिंगे यांच्याकडे प्रकल्प दस्तावेज देऊन गुरूवारी ओशिवरा पोलीस स्थानक येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला एसीपी सुनील बोंडे, वर्सोवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार, ओशिवरा पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनी साळुंखे, दोन्ही पोलीस स्थानकाचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी, वर्सोवा क्षेत्रात सामाजिक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश गिडवाणी, भारत शर्मा उपस्थित होते.

"आपला परिसर आपली जबाबदारी" हा प्रकल्प संकल्प सिद्धी ट्रस्ट मुंबई ही संस्था "सार्वजनिक सुरक्षितता आणि सुरक्षा" ह्या विषयाला अनुसरून सातत्याने  राबवत आहे. मुंबई शहरात २०१७-१८  मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अति संवेदनशील ठिकाणांवर साधारण ५००० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यानंतर सुमारे ५०००  कॅमेरे अजून बसवण्याचा प्रस्तावही होता.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ